Two farmers commit suicide in Vidarbha 
विदर्भ

विदर्भात दोन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा; नापिकी, कर्जाला होते कंटाळले

सकाळ डिजिटल टीम

यवतमाळ-अमरावती : सततची नापिकी आणि कर्डबाजारीपणाला कंटाळून विदर्भातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हे दोन शेतकरी प्रत्येकी यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील आहेत.

प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील माळेगाव (ता. आर्णी) येथील शेतकरी कैलास दगडू पवार (वय ४५) यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांनी ऑक्टोबर महिन्यात २६ तारखेला घरात विषप्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ३० ऑक्‍टोबरला त्यांचा त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले व सून व मोठा परिवार आहेत.

दुसरी आत्महत्याची घटना अमरावती जिल्ह्यातील खानापूर येथे घडली. अमरावती शहरालगतच्या खानापूर येथील युवा शेतकरी तुषार ज्ञानेश्‍वर अवघड (वय २२) याने सततच्या नापिकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (ता. तीन) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्याने घरातील खोलीत पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. मोठा भाऊ चेतन अवघड यांनी नांदगावपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू, अशी नोंद केली आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने सुरक्षा जवानाचा मृत्यू

अमरावतीच्या वडाळी परिसरातील रहिवासी तसेच देशाच्या सीमा सडक संघटनेतील सुरक्षा जवान नारायण काशीराव रेवस्कर यांचे मंगळवारी (ता. ३) दुपारी सेवेवर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नारायण रेवस्कर राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात देशाच्या सीमेवर सेवा देत होते. मृत्यूसमयी ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यांच्या मृत्यूची माहिती सीमा सडक संघटना (बीआरओ) विभागाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिली.

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT