File photo
File photo 
विदर्भ

पिके नष्ट होण्याच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा

वनोजाबाग(अमरावती) : मागील एक महिन्यापासून अधूनमधून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अंजनगावसुर्जी तालुक्‍यातील वनोजाबाग, गावंडगाव, सातेगाव, कुंभारगाव, चिंचोली, हिंगणी तसेच आजूबाजूच्या खेड्यागावातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांची पूर्णपणे नासाडी होत आहे. त्यामुळे शेतातील पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून पीकविमा देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

सुरुवातील पाऊस न आल्यामुळे मूग व उडीद ही पिके नष्ट झाली. त्यानंतर काही दिवसांनी पावसाला सुरुवात झाली. असे असताना तूर, कपाशी, सोयाबीन ही पिके शेतात डोलू लागली. मात्र सततच्या पावसामुळे शेतात उभी असलेली पिके खराब होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी शेतकऱ्यांना उत्पन्नदेखील कमी होणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तथापि, शासनाने शेतातील नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत जाहीर करावी तसेच पीकविमा देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य मिळाल्यास
कमीत कमी रब्बीचे नियोजन तरी करता येणार असल्याचे बोलले जात आहे. कृषी अधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी तालुक्‍यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT