विदर्भ

भाजपच्या 'अमरावती बंद'ला हिंसक वळण; जमावाकडून गाड्यांची तोडफोड

सकाळ डिजिटल टीम

अमरावती: त्रिपुरा येथील हिंसात्मक घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी काल शुक्रवारी मुस्लिम समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली होती. या घटनाक्रमाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं होतं. त्याच्या निषेधार्थ आज भाजपने शहर बंदचं आवाहन केलं होतं. या बंदला आता हिसंक वळण लागल्याचं चित्र आहे.

अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण घेत असल्याचं दिसत आहे. भाजपने बंदचं आवाहन केलं होतं. यामध्ये काही गाड्यांची तोडफोड झाल्याचं दिसत आहे. जे रस्त्यात दिसत आहे त्याला बंद करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. जय श्रीरामच्या घोषणा आंदोलकांकडून सुरु आहेत. आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु असून त्यांच्या हातात काठ्या आहेत. मोठ्या प्रमाणावर आंदोलक रस्त्यावर उतरले असून आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे, अशी माहिती मिळत आहे. पोलिसांकडून या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

काल काय घडलं?

काल दुपारी अडीचच्या सुमारास घोषणा देत नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचत होते. त्यापैकी काहींना चित्रा चौकात मुरमुरे, फुटाणे विक्रेत्यांची काही दुकाने उघडी दिसली. काही संतप्त नागरिकांनी बंदची मागणी करून दुकानाच्या दिशेने दगडफेक केल्याचे सांगण्यात येते. त्यात फुटाने विक्रेता श्रीराम गुप्ता हे जखमी झाले. वसंत चौक बालाजी मंदिराजवळ मेडिकल पॉइंटवर सुद्धा काहींनी दगड भिरकावले. चित्राचौक ते जुन्या कॉटन मार्केट मार्गावरील गोपाल किराणा या प्रतिष्ठानलाही बंद करण्यासाठी दगडफेक झाली होती. आंदोलनकर्त्यांनी अमरावतीतील जयस्तंभ चौक आणि शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांची तोडफोड केली. तसेच मालेगावमध्येही आंदोलनाला हिंसक वळण लागले. भिवंडी, नांदेडमध्ये देखील अशा घटना घडल्याचे समोर आले आहे.

घटनाक्रम कुठून सुरु झाला?

बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यासाठी त्रिपुरामध्ये पोलीस परवानगी देत नव्हते, असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता. यावरुन हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. बांगलादेशात झालेल्या हिंसाचारात सात जणांचा मृत्यू झाला होता. मंदिरांमध्ये नासधूस करण्यात आली होती. हिंदू अल्पसंख्याक असलेल्या बांगलादेशात शेकडो घर आणि मालमत्तांचं नुकसान करण्यात आलं होतं. त्याचा निषेध त्रिपुरामध्ये नोंदवण्यासाठी तिथले हिंदुत्ववादी प्रयत्न करत होते. त्याठिकाणी हिंसा घडल्याचं दिसून आलं. अनेक मुस्लिमांची दुकाने फोडण्यात आली होती. त्रिपुरातील या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी म्हणून काल महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मुस्लिम समाज आणि संघटनांकडून निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याला हिंसक वळण लागल्याचं दिसून आलं. त्याचेच पडसाद आज दिसून येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Hockey Asia Cup: भारत पुन्हा आशियाचा बादशाह! आशिया कप फायनलमध्ये कोरियाचा पराभव, चषकावर चौथ्यांदा ताबा मिळवला

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू

Ganpati Visarjan 2025 : देगलूरनगरीत ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या... या घोषणेने शहर दुमदुमले...!

उत्सवप्रिय सोलापुरात पहिल्यांदाच डीजेमुक्त मिरवणुका! पोलिस आयुक्तांचे मायक्रो प्लॉनिंग, सोलापूर कृती समितीसह सर्व सोलापूरकरांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT