Wardh Natural Disaster
Wardh Natural Disaster 
विदर्भ

वर्ध्यात हादऱ्यांनी घरांना तडे

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : शहरातील रामनगर परिसरात मोठा आवाज होऊन घरांना हादरे बसले. यात परिसरातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले तर काही घरांच्या काचा फुटल्या. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. हा प्रकार नेमका कशाने घडला, यासंदर्भात मात्र प्रशासनाकडून काहीच सांगण्यात आले नाही. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रामनगर येथील वंजारी चौक परिसरात वामन वंजारी यांचे सायकलचे दुकान आहे. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अचानक जोराचा आवाज झाला. नागरिकांनी पाहणी केली असता वरच्या माळ्यावरील घराच्या भिंतीला तडे गेले. परिसरातील नगरसेवक पवन राऊत यांच्या घराच्या काचा फुटल्या. रस्त्याच्या समोरील दुकानातील काचा फुटल्या.

आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. यावेळी झालेल्या आवाजामुळे घरात जाऊन सिलिंडरचा स्फोट झाल्याचा अंदाज आल्याने नागरिकांनी घराकडे धाव घेतली. त्यामुळे नगरसेवक यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.

मात्र, चौकशी केली असता सिलिंडर किंवा तत्सम वस्तू साबूत असल्याचे आढळून आले. घराची पाहणी केली असता घरातील टाइल्स, फुटल्या भिंतीला तडे गेले होते. घराचा दरवाजा खिळखिळा झाला होता. घरात कुणी नसल्याने अनुचित घटना टळली. आवाजासह काही सेकंदांसाठी भिंती हलल्याची जाणीव झाल्याचे येथील व्यवसायी सचिन तामगाडे यांनी सांगितले. घटनेचे नेमके कारण काय हे स्पष्ट झाले नाही.

घडलेल्या प्रकाराची पाहणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर घटनेचे नेमके कारण स्पष्ट होईल.

-रमेश कोळपे, तहसीलदार वर्धा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT