गिरड : हक्काच्या निवाऱ्याकरिता जागेचे पट्टे मिळावे या आशेत असलेले नागरिक.
गिरड : हक्काच्या निवाऱ्याकरिता जागेचे पट्टे मिळावे या आशेत असलेले नागरिक. 
विदर्भ

वर्धा : हक्काच्या निवाऱ्याचे स्वप्न अधुरेच!

गजानन गारघाटे

गिरड (जि. वर्धा) : प्रत्येकाला हक्‍काचे घर मिळावे, यासाठी शासनाने अतिक्रमणधारकांना जमिनीचा हक्‍क देण्याचा निर्णय घेतला होता. शहरी भागात काही प्रमाणात याची अंमलबजावणी झाली. पण, ग्रामीण भागात सध्या "ये रे माझ्या मागल्या' अशीच स्थिती आहे. यातही हक्‍काची जागा देण्याकरिता लोकप्रतिनिधी आणि शासनाचे अधिकारी उदासीन असल्याने अनेकांचे हक्‍काच्या निवाऱ्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे.

समुद्रपूर तालुक्‍यातील सर्वाधिक लोकसंख्येच्या गिरड गावातील हे वास्तव आहे. बाबा फरीद टेकडीच्या सान्निध्यात वास्तव्यास असलेल्या तीनशेहून अधिक कुटुंबाचा हा प्रश्न आहे. अतिक्रमित जागेचे पट्टे मिळाल्यास घरकुलाचे स्वप्न पूर्ण होईल.

याविषयी वारंवार पत्रव्यवहार आणि मागण्या केल्या; तरी शासनाच्या कानावर त्या पोहोचत नाही. या मागणीकरिता शेकडो कुटुंबीयांनी जागेचे साखळी उपोषणाचे शास्त्र उगारले होते. चार दिवस चाललेले उपोषण आश्‍वासनामुळे मागे घेतले.

संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेले आश्‍वासन सध्या हवेत विरल्याचे दिसते. गत पन्नास वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या या कुटुंबाचे प्रश्न अबाधित आहे. गावात साधारणत: 3,500 घर संख्या आहे. यातील जुनी वस्ती वगळता इतर घरे अतिक्रमित जागेवर आहेत.

या अतिक्रमित घरांना ग्रामंपचायत प्रशासनाने अद्याप हक्काचे पट्‌टे मिळवून दिलेले नाहीत. गत पन्नास वर्षांत या वस्तीत वाढ झाली. फरीद बाबा टेकडीच्या पायथ्याशी मिळेल त्या जागेवर तीनशे ते चारशे कुटुंब वास्तव्य करतात. त्यांचे घरकुलाचे स्वप्न अद्यापही अधांतरीच असल्याचे दिसत आहे.

आश्‍वासन हवेतच विरले
अर्ध्या शतकापासून वास्तव्य असलेल्या या नागरिकांची नावे घरकुलाच्या यादीत आली. पण, जागेचे पट्‌टे नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. जागेचे पट्टे मिळावे यासाठी शासनाच्या दरबारी येरझारा मारत आहेत. स्थानिक नेत्याकडून मताचे गणित साध्य करण्याकरिता जागेचे पट्टे देण्याचे आश्‍वासन दिले. पण, ते हवेतच विरले.

ग्रामसभेत ठराव पारित
ग्रामपंचायतीकडे अतिक्रमणधारकांनी मागणी केली आहे. गरजू कुटुंबांना पट्टे मिळावे याबाबत ग्रामसभेत ठराव पारित केला आहे. अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे मिळण्यासाठी संबंधित तहसीलदारांकडे पत्रव्यवहार केला आहे. येत्या काही दिवसात अतिक्रमण धारकांचा प्रश्‍न निकाली निघेल.
- विजय तडस.
सरपंच, ग्रामपंचायत गिरड


हक्काचा पट्टा मिळावा
गत तीस वर्षांपासून कुटुंबासह वास्तव्यास आहे. स्वकष्टातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. हक्काचे घर हवे आहे. यासाठी अतिक्रमित जागेचा हक्‍काचा पट्टा मिळावा यासाठी ग्रामपंचायतीकडे मागणी केली आहे. मात्र कुणीही याकडे लक्ष देण्यास तयार नाही.
- मोरेश्‍वर शेंडे

योजनेच्या लाभापासून वंचित
घरकुल यादीत नाव आल्यावरही लाभ घेता येत नाही. लाभासाठी स्वत:च्या हक्काची जागा असल्याचा पुरावा पाहिजे. तो आमच्याकडे नाही. यामुळे आम्हाला घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
- लता ताजने


आशा कायम आहे
आज, उद्या घरकुल मिळेल ही आशा कायम आहे. मात्र, आमचे वास्तव्य ज्या जागेवर आहे. ती जागा हक्काची नाही. म्हणून आम्हाला घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.
- सुरेखा तेलरांधे


कितीवेळा उंबरठे झिजवावे
कितीवेळा प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे हे कळत नाही. बरेचदा तहसीलदारांकडे पट्टे मिळविण्यासाठी गेलो. ग्रामपंचायतीकडे मागण्या केल्या. मात्र काहीही उपयोग झाला नाही.
- विकास वाघे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT