विदर्भ

खेकरानाल्यातून नागपूरसाठी पाणी 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - खापाजवळ कोच्छी धरणात पाणी अडविल्याने कोरडी झालेल्या कन्हान नदीतून कच्चे पाणीच मिळेनासे झाल्याने शहरावर जलसंकट उभे ठाकले आहे. मात्र, यावर मात करण्यासाठी खेकरानाला जलाशयातून नागपूरसाठी आज पाणी सोडण्यात आले. मात्र, हे पाणी कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यास पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे उत्तर, दक्षिण व पूर्व नागपुरातील नागरिकांना आणखी पाच दिवस झळ सहन करावी लागणार आहे. 

पेंच व नवेगाव खैरीतील अल्पसाठ्यानंतर पूर्व नागपूरसह उत्तर व दक्षिण नागपुरात पाणीपुरवठा होत असलेल्या कन्हान नदीत कोच्छी येथे बांधण्यात आलेल्या धरणातून पाणी न सोडल्यास आजपासून शहरवासींची "जलकोंडी' होणार असल्याबाबत "सकाळ'ने सोमवारी (26 नोव्हेंबर) ठळकपणे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासनाने तत्काळ जलसंपदा विभागाकडे एक हजार एमएलडी पाण्याची मागणी नोंदविली. आज जलसंपदा विभागाने 333.3 एमएलडी पाणी खेकरानाला जलाशयातून कन्हान नदीत सोडले. कन्हान नदीवरील धरणात पाणीसाठा झाल्यानंतर ते नदीच्या पात्रात सोडण्यात येणार आहे. पात्रातून पाणी कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचणार आहे. मात्र, यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या उत्तर, दक्षिण व पूर्व नागपुरातील नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान, आज कन्हान जलशुद्धीकरण केंद्राजवळील नदीचे पात्र आणखी कोरडे झाले असून, सध्याच्या 190 एमएलडीच्या 70 टक्केच कच्चे पाणी मिळत आहे. त्यामुळेही शहरवासींवर ताण पडणार आहे. 

निम्मेच पाणी मिळणार 
महापालिकेने जलसंपदा विभागाकडे एक हजार एमएलडी पाण्याची मागणी केली. खेकरानाला जलाशयातून कोच्छी येथील धरण व धरणातून कन्हान नदीच्या पात्रातून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येईस्तोवर केवळ निम्मेच पाणी राहणार आहे. त्यामुळे शहरवासींना काटकसर करीत पाण्याचा वापर करावा लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT