Quawalli 
विदर्भ

कव्वाली बघायला गेले अन्‌ झाले वेगळेच... 

सकाळ वृत्तसेवा

आष्टी शहीद (जि. वर्धा) : कव्वालीचा कार्यक्रम बघायला गेलेल्या रसिक प्रेक्षकांना सकाळी उठल्यानंतर डोळ्यांचा आजार जडल्याचा अजब-गजब प्रकार शहरात उघडकीस आला. येथील ग्रामीण रुग्णालयात एकाच "फोटोक्रोमिक' नावाच्या आजाराने बाधित रुग्णांवर औषधोपचार करताना डॉक्‍टरांची तारांबळ उडाली. 

100 वर रुग्णांची दवाखान्याकडे धाव

प्राप्त माहितीनुसार, रविवारी, 26 जानेवारीला येथील काही समाजसेवकांनी रसिक प्रेक्षकांसाठी कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो बघण्यासाठी रसिकांनी एकच गर्दी केली. मात्र, कार्यक्रम बघून प्रेक्षक घरी गेल्यानंतर त्यांना डोळ्यांमध्ये जळजळ, पाणी येणे, दिसायला कमी येणे इत्यादी लक्षणे जाणवू लागली. सकाळी उठल्या-उठल्या सर्वांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. एकाच प्रकारचे रुग्ण बघून तेथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. 

हॅलोजनने केला घात

या रुग्णांची संख्या 100 च्यावर होती. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आर्शिया यांनी हा प्रकार कार्यक्रमात लावलेल्या हॅलोजन या उग्र प्रकाशाच्या दिव्यांनी डोळ्यांना "फोटोक्रोमिक' आजार झाला असल्याचे सांगितले. या रुग्णांवर योग्य औषधोपचार केला असून आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्या म्हणाल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरला पंतप्रधान मोदी आज देणार भेट

Mumbai : अभिनेत्रीनं धावत्या लोकलमधून मारली उडी, डोक्याला अन् पाठीला गंभीर दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

ENG vs SA 2nd T20 : इंग्लंडचा T20I मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला; नोंदवले एकापेक्षा सरस रेकॉर्ड

Nagpur News: रेल्वेच्या छतावर चढताच विजेचा धक्का; युवकाची प्रकृती चिंताजनक, रेल्वे स्थानकावरील घटना

मोठी बातमी! पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘टीईटी’; सुप्रिम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार गप्पच; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’

SCROLL FOR NEXT