लाखनी : श्री. देशमुख यांच्या शेतात पाण्यावर तरंगत असलेले खताचे दाणे. 
विदर्भ

असे का घडले? पाण्यावर तरंगले रासायनिक खत!

शैलेश उरकुडे

लाखनी(भंडारा) : पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. विहिरीची सोय असणाऱ्यांनी कशीतरी रोवणी केली. पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी मिश्र खताचा डोस दिला. पण, त्यातून नवीनच प्रकार उघड झाल्याने येथील शेतकरी आश्‍चर्यचकित झाले आहेत. नामांकित कंपनीचे मिश्र खत चक्क पाण्यावर तरंगत आहे. कृषिकेंद्रातून आपल्याला असे बोगस खत विकल्याची तक्रार नरेंद्र देशमुख या शेतकऱ्याने कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यावरून चौकशीसाठी अधिकाऱ्यांची चमू आज येथे दाखल झाली आहे. 


 येथील शेतकरी नरेंद्र देशमुख यांनी भय्याजी कृषिकेंद्रातून आरसीएफ कंपनीद्वारे निर्मित सुफला २०:२०:०:१३ हे मिश्र खत खरेदी केले. शेतात रोवणी झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी (ता. ३१) ला पिकाला खताची मात्रा दिली. मात्र, शेतात खत टाकल्यावर खताचे काही दाणे पाण्यावर तरंताना आढळले. त्यामुळे त्यांनी जिथे आधी खत टाकले होते. त्या बांधीत जाऊन पाहिले तर, त्यांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. पाणी साचलेल्या बांधीत खत पाण्यावर तरंगत असलेले दिसून आले. आपल्या डोळ्यावर विश्‍वास ठेवता त्यांनी जवळच्या शेतकऱ्याला बोलावून त्याला हा प्रकार दाखवला.  रासायनिक खत कधीही पाण्यावर तरंगत नाही अशी माहिती जवळच्या वयोवृद्ध शेतकऱ्याने दिल्यामुळे आपली फसवणूक तर झाली नाही? असा प्रश्‍न श्री. देशमुख यांच्या मनात निर्माण झाला.   
त्यामुळे त्यांनी लगेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी माणिक जांभूळकर यांना भ्रमणध्वनीद्वारे या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर श्री. जांभूळकर यांनी त्यांच्या बांधावर भेट देऊन पाहणी केली. यानंतर तालुक्‍यातील कृषिकेंद्रांना रासायनिक खताची विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच झालेल्या प्रकाराची माहिती कंपनीचे अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व वरिष्ठांना दिली. त्यावरून आज, शनिवारी कंपनीचे अधिकारी, कृषी अधिकारी व शेतकऱ्यांनी शेतात जाऊन पाहणी केली.

पोकळीमुळे तरंगले खत 
रासायनिक मिश्र खताचे कोटिंग करताना टाकाऊ कृषी उत्पादनांचा वापर केला जातो. असे कोटिंग करताना हवेतील आर्द्रतेमुळे पोकळी निर्माण होते. ते खत भिजल्यावर त्यात हवा पाणी शिरल्याने खताचे दाणे पाण्यावर येतात. नंतर काही वेळाने जमिनीवर बसतात, असे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.
 


खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यावर सत्यता समजून येईल.
-एम. के. जांभूळकर, कृषी अधिकारी, पं. स. लाखनी.

रोवणी झाल्यानंतर शुक्रवारी बांध्यांत खत मारले. काही वेळाने काही खत पाण्यावर तरंगताना दिसून आले. या खताचा पिकाला किती फायदा होईल असा प्रश्‍न आहे.
-सुनील देशमुख, शेतकरी, लाखनी
 
 

-संपादन ः चंद्रशेखर महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT