विदर्भ

Loksabha 2019 : मोदींना हरवल्यानंतर त्यांना चौकीदाराचेच काम देऊ: शरद पवार

वृत्तसंस्था

बुलडाणा: नरेंद्र मोदींना हरवल्यानंतर त्यांना चौकीदाराचेच काम देऊ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. विकासाचं मॉडेल बघण्यासाठी जनतेनी भाजप-सेनेची सत्ता देशात आणि राज्यात आणली. मात्र विकासाचं मॉडेल तर आलेच नाही आत्महत्यांचे सत्र वाढले. देशाच्या सत्तेमध्ये शेतकऱ्यांप्रती आस्था नसलेल्या व्यक्तींचा भरना असल्याने या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचेही पवार यांनी म्हटले. 

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना काँग्रेसच्या कार्यकाळात आम्ही आमलात आणल्या. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी केली. देशात सत्ता आल्यास आम्ही सरसकट कर्जमाफी करू आणि शेतकऱ्यांच्या शेत मालाला दीडपट हमीभाव देऊ असे आश्वासन पवार यांनी दिेले. जगाच्या दबावापुढे अभिनंदनला पाकिस्तानने सोडले.  मात्र, मोदी याचं श्रेय घेण्यात मग्न आहेत 56 इंच छाती असणार्‍या मोदींनी कुलभूषणला का सोडवले नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

न खाऊंगा ना खाने दुंगाचा आव आणणाऱ्यांनी  350 कोटींचे विमान 1650 कोटीला खरेदी केले आहे. अंबानींनी कधी कागदाचे विमान सुद्धा तयार केले नाही त्यां अंबानीना राफेल विमान तयार करण्याची जबाबदारी या शासनाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT