Waari 2023 Sakal
वारी

Waari 2023 : फेसबुक दिंडीची 'खिल्लार वारी'!

या उपक्रमातून देशी गोवंशाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

यंदाच्या पंढरीच्या वारी सोहळ्यामध्ये "फेसबुक दिंडी" आणि "खिल्लार महाराष्ट्राची शान" या दोन संस्था देशी (खिल्लार) गोवंशाचे जतन, संवर्धन व्हावे, त्याविषयी लोकजागृती घडून व्हावी या उद्देशाने “खिल्लार वारी“ ही कौतुकास्पद मोहीम राबवत आहेत. यामध्ये देशी गोवंश सांभाळणे किती फायदेशीर आहे? देशी गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाशिवाय, तूप, शेण, गोमूत्र याचे महत्व काय आहे? याविषयी माहिती देण्यात येणारे.

भूतदया गाईपशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी॥

पंढरीची वारी हा सगळ्यांचा सोहळा आहे. संतांच्या पालख्या खांद्यावर नाचवत लाखो वारकरी दरवर्षी पंढरपुरला जातात. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रातील हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा. फार पूर्वी म्हणजे तुकोबांच्याही आधीपासून पंढरीची वारी पायी करण्याची प्रथा तुकोबांच्या घराण्यात होती. तुकोबांचे आठवे वंशज विश्वंभर बाबांनी वारी केल्याचा उल्लेख महिपतिकृत तुकाराम चरित्रात सापडतो. नंतर तुकाराम महाराजाचे सुपुत्र नारायण महाराजांनी पालखी सोहळा १६८५ साली सुरू केला. त्याला या वर्षी ३३८ वर्षे झाली आणि कालांतराने ही पालखी बैलजोडी असलेल्या रथात ठेऊन पंढरीस जाऊ लागली.

संतांच्या या पालख्या बैलगाडीत-रथात ठेवून या खिल्लार बैलजोड्या आनंदाने ओढत आल्या आहेत. हा रथ आपल्या गावच्या हद्दीवर आल्यावर गावातल्या शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी संतांच्या पालखी रथाला जोडून सेवा केली आहे. संतांच्या पालखीचे भोई होण्याचा मान खिल्लार बैलांनाही आहे. एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या वाटचालीत एका अवघड घाटात वारकऱ्यांना बैलगाडीत बसवले जाते व घाट पार करण्यासाठी मदत केली जाते. आता रस्ता सुकर झाला असला तरी हि परंपरा कायम आहे. या साऱ्यासेवेत रथाला ओढण्यासाठी महाराष्ट्रातील लोकप्रिय देशी गोवंश म्हणजे खिल्लार बैलजोडी आघाडीवर असतात.

पहिल्या पावसानंतर पेरणी करून मूळचा शेतकरी असलेला वारकरी वारीच्या वाटेला चालू लागतो. तसेच त्या पालखी रथाचे खरे भोई असणारे बैल, प्रस्थान पासून ते अगदी परतीच्या संपुर्ण वारीच्या काळात हा शेकडो टन वजनाचा पालखी रथ आपल्या खांद्यांवर घेऊन वारी पुर्ण करतात. याच देशी गोवंशांच्या संगोपण आणि संवर्धनासाठी तुकोबांनी आपल्या अभंगात पशुधनांचे पालन आणि जोपासना करणे हाच वारकर्‍याचा गुणधर्म आहे असे संगितले आहेच. फेसबुक दिंडी दरवर्षी वारीच्या कालावधीत सामाजिक विषयांवर भाष्य करत विशेष सामाजिक उपक्रम हाती घेते. यावर्षी याच मोहिमेअंतर्गत फेसबुक दिंडी आणि खिल्लार महाराष्ट्राची शान ही संस्था देशी (खिल्लार) गोवंशाचे जतन, संवर्धन व्हावे, त्याविषयी लोकजागृती घडून व्हावी या उद्देशाने “खिल्लार वारी“ ही मोहीम राबवली जात आहे.

याअंतर्गत...

1. देहू आणि आळंदी पालखी सोहळ्याचे रथ कसा असतो? आणि रथाच्या बैलांची निवड कशी केली जाते?

2. देहूगाव ते पंढरपूर तुकाराम महाराज पालखीचा प्रवास आणि आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर महाराज पालखीचा प्रवास कसा असतो ? किती किलोमीटर, घाट, गावे कोणकोणती ? आणि परतीची वारी कशी असते याबद्दल अधिक माहिती.

3. देशी गोवंशापासून ज्यांनी शेतीमध्ये जो आमूलाग्र बदल केला याबद्दल सविस्तर माहितीपट.

4. बैलगाडा शर्यत बंदी उठली याचा कोणता फायदा देशी गोवंशासाठी-खिल्लार साठी झाला?

5. रथाला जी बैल जोडी असते, त्यांची पूर्ण दिनचर्या कशी असते, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी पालखी तळावर पोहचेपर्यंत ?

6. खिल्लार पालनातून शेतकऱ्यांना कोणता फायदा, व्यवसाय ते उत्तम रीत्या करू शकतात ?

7. देशी गोवंश सांभाळणे किती फायदेशीर आहे. देशी गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाशिवाय, तूप, शेण, गोमूत्र याचे महत्व काय आहे?

असे विविध विषय खिल्लार वारी या उपक्रमामध्ये यंदाच्या वर्षी पाहण्यात येणार आहेत.

या उपक्रमासाठी 'फेसबुक दिंडी' टीमचे स्वप्नील मोरे, सुरज दिघे, सुमित चव्हाण, अमोल निंबाळकर, संतोष पाटील, ओंकार महामुनी, अमोल गावडे, निखील पवार, मंदार जाधव हे कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT