Friendship-with-Child
Friendship-with-Child 
वुमेन्स-कॉर्नर

पालकत्व निभावताना... : मुलांशी मैत्री

आशिष तागडे

नितीनला गेल्या काही महिन्यांपासून अनिकेतमधील वागणे खटकत होते. परंतु, सध्याच्या सामाजिक परिवर्तनाचा हा परिणाम असावा म्हणून त्याने काही काळ दुर्लक्ष केले. मात्र, गेल्या महिनाभरापासून अनिकेत घरातील प्रत्येक बाबतीतच चिडचिड आणि आक्रस्ताळेपणा करायला लागला होता. आता मात्र हे प्रकरण जरा हाताबाहेर जात असल्याची जाणीव नितीनला झाली. परंतु, कोणाशी बोलावे, याचा काहीच उलगडा नितीनला होत नव्हता. अनिकेत किशोरवयीन असला, तरी त्याला चांगली समज होती. त्याने बाबांना म्हणजे अनिकेतच्या आजोबांना फोन लावला. या प्रश्नाचे उत्तर बाबांकडे निश्चित असणार, याची त्याला खात्री होती. बाबांना फोनवर सर्व समस्या सांगितल्यावर ते हसत म्हणाले, ‘‘काय नितीन, अरे किती सामान्य प्रश्न आहे. अनिकेतला कंटाळा आला असेल तर माझ्याकडे दापोलीला पाठव. मी पाहतो.’’ त्यावर नितीन म्हणाला, ‘‘बाबा तसे नाही, काय समस्या हे मला समजून घेऊन ती सोडवायची आहे. तुम्ही मदत करा.’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

समजावणीच्या सुरात बाबा म्हणाले, ‘‘अरे नितीन, तुम्ही समजता त्यापेक्षा अनिकेतची पिढी खूपच पुढची आहे. तिला समजून घेताना त्या वयात जायला पाहिजे. समाजपरिवर्तनाच्या लाटेत तंत्रज्ञानाचा अतिरेकी आणि अयोग्य वापराचाही यात वाटा आहेच. सिनेमा, टीव्ही, इंटरनेटवरील हिंसेचं, लैंगिकतेचं अनिर्बंध उदात्तीकरण, आक्रमक आणि हिंसेच्या भावनेला खत पाणी घालणारे, मुलांना उत्तेजित करणारे व्हिडिओ गेम्स, आजूबाजूला फोफावत चाललेला चंगळवाद या सगळ्याचाच असं घडण्यात वाटा आहे. आपण ती समजून घेतली पाहिजेत. समाजातील सगळ्या अस्वस्थतेमुळे मुलांमधील नकारात्मक वृत्ती निर्माण झालीय. मुलांना या वयातच समजून घ्यायचे असते. आपला अनिकेत तर हे निश्चित समजून घेईल, अशी मला खात्री आहे. फार काळजी करू नकोस. याची काही कारण मी सांगतो त्यावर शांतपणे विचार कर.

  • पौगंडावस्थेतील मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीत काही बदल होत असतात.
  • या वयातील हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. तसंच समोरच्याच्या भावना, कृती, चेहऱ्यावरील भावना समजून घेण्यात मुलांची चूक होऊ शकते. 
  • मुलांमधील वागण्यात अचानक काही बदल होऊ शकतात, त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.
  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे काही आपल्या अनिकेतबाबतच घडते असे नाही, पौगंडावस्थेतील सर्वच मुलांच्या बाबतीत घडते. काही जणांना त्याचा सामना करताना अडचणी येतात इतकंच. 

‘बाबा तुमच्याशी बोलून खरंच मन हलकं झालं. आता मीच त्याचा मित्र होतो आणि समस्या दूर करतो. आणि हो तुम्ही म्हणाल्याप्रमाणं त्याला बदल म्हणून दहा-पंधरा दिवसांसाठी दापोलीला पाठवतो. शक्य झाले तर मी पण येतो,’’ नितीन म्हणाला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT