अनिल अंबानींच्या आरकॉमला 30 हजार कोटींचा तोटा

Anil Ambani s Reliance Communication suffers loss of 30 thousand crore
Anil Ambani s Reliance Communication suffers loss of 30 thousand crore

अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत तब्बल 30,142 कोटी रुपयांच्या तोट्याची नोंद केली आहे. सरकारला द्यावयाच्या थकबाकीसाठी तरतूद केल्यामुळे रिलायन्स कम्युनिकेशन्सला जबरदस्त तोटा झाला आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्सने नोंदवलेला तोटा हा भारतातील उद्योगविश्वातील दुसरा सर्वात मोठा तोटा आहे. दोनच दिवसांआधी व्होडाफोन आयडिया या देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपनीने दुसऱ्या तिमाहीसाठी म्हणजेच जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी देशातील सर्वात मोठ्या तोट्याची नोंद केली होती. व्होडाफोन आयडियाला दुसऱ्या तिमाहीत 50,921 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

सरकारला लायसन्स शुल्कापोटी द्यावयाच्या रकमेसाठी तरतूद करावी लागल्यामुळेच व्होडाफोन आयडियाला हा प्रचंड तोटा झाला आहे. त्याचबरोबर भारती एअरटेलनेही 23,000 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सने 28,314 कोटी रुपयांची तरतूद सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दूरसंचार खात्याकडे जमा कराव्या लागणाऱ्या शुल्कासाठी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com