सध्याच्या काळात टेक्नोलॉजीमुळे लग्नासाठी योग्य वर-वधू शोधणे खूप सोपे झाले आहे. मात्र तामिळनाडूमध्ये तब्बल 40,000 हून अधिक ब्राह्मण तरुणांना राज्यात वधू शोधणे कठीण जात आहे. दरम्यान अशा तरुणांसाठी आता तामिळनाडूस्थित ब्राह्मण संघाने उत्तर प्रदेश आणि बिहारमधील समान समुदायाशी संबंधित वधूशोधण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.
तामिळनाडू ब्राह्मण असोसिएशनचे (थांब्रस) अध्यक्ष एन नारायणन यांनी संघटनेच्या मासिक तामिळ मासिकाच्या नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित केलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, "आम्ही आमच्या संगमच्या वतीने विशेष आंदोलन सुरू केले आहे," ते पुढे म्हणाले की, 30-40 वयोगटातील 40,000 हून अधिक तमिळ ब्राह्मण पुरुष लग्न करू शकत नाहीत कारण त्यांना तामिळनाडूमध्ये स्वत:साठी वधू शोधता येत नाहीयेत. बॉलपार्कची आकडेवारी देताना ते म्हणाले, "विवाहयोग्य वयोगटात 10 ब्राह्मण मुले असल्यास, तामिळनाडूमध्ये त्या विवाहयोग्य वयोगटात फक्त सहा मुली उपलब्ध आहेत."
त्यांनी पुढे सांगीतले की, तरुणांसाठी वधू शोधण्यासाठी दिल्ली, लखनव आणि पाटणा येथे समन्वयकांची नियुक्ती केली जाईल, ज्या व्यक्तीला हिंदी वाचता, लिहिता आणि बोलता येते अशा व्यक्तीला संघाच्या मुख्यालयात समन्वयाची भूमिका बजावण्यासाठी नियुक्त केले जाईल.
त्यांनी पीटीआयला सांगितले की, ते लखनौ आणि पाटणा येथील लोकांच्या संपर्कात आहेत आणि ही योजन राबवली जाऊ शकते. याबाबत मी काम सुरू केले आहे, बर्याच ब्राह्मणांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. लग्नयोग्य वयोगटात पुरेशा तमिळ ब्राह्मण मुली नसल्या तरी, केवळ हेच कारण नाही की मुले वधू शोधू शकत नाहीत असे मत एक शिक्षणतज्ञ असलेल्या एम परमेश्वरन यांनी सांगितले, ते म्हणाले की, नवरदेवाचे आई-वडील लग्न समारंभात मोठा खर्चाची अपेक्षा ठेवतात असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी प्रश्न विचारला की, "मुलांच्या पालकांना लग्न आलिशान मॅरेज हॉलमध्ये व्हावे असे का वाटते? त्यांना साधेपणाने लग्न करण्यापासून काय रोखते? मंदिरात किंवा घरात का नाही? त्यापुढे परमेश्वरन म्हणाले की, मुलीच्या कुटुंबाला लग्नाचा संपूर्ण खर्च उचलावा लागतो आणि हा तमिळ ब्राह्मण समाजाचा शाप आहे. महागडे लग्न समारंभ हे स्टेटस सिम्बॉल बनले आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. समाजाने प्रगतीची निवड करावी. आजकाल दागिने, विवाह हॉलचे भाडे, जेवण आणि भेटवस्तूंवर होणारा खर्च किमान 12-15 लाख रुपयांपर्यंत येतो असेही त्यांनी सांगितले.
आता तामिळ-तेलुगु ब्राह्मण विवाह किंवा कन्नड भाषिक माधव आणि तमिळ भाषिक स्मार्त यांच्यात विवाह होणे सामान्य आहे. अनेक दशकांपूर्वी असे काहीतरी अकल्पनीय होते, आधीपासूनच, आम्ही उत्तर भारतीय आणि तमिळ ब्राह्मणांमध्ये जुळवून घेतलेले विवाह पाहिले आहेत असे वधूच्या शोधात असलेल्या एका तरुणाने सांगितले.
माधव ब्राह्मण हे वैष्णव संप्रदाय आणि श्री मध्वाचार्यांचे अनुयायी आहेत. तामिळनाडूमध्ये 'अय्यर' म्हणून ओळखले जाणारे स्मार्त हे सर्व देवतांची पूजा करतात आणि ते श्री आदि शंकराचे अनुयायी आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर एका वैष्णव तमिळ ब्राह्मणाने सांगितले की, वर्षांपूर्वी अय्यंगार समाजात थेंकलाई आणि वडकलाई पंथांमध्ये विवाह होणे देखील अशक्य होते. आज ते होत आहेत. अनेकांनी संघटनेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.