दिल्लीत लस न घेतल्याने ७५ टक्के मृत्यू; आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची माहिती

delhi corona
delhi coronafile photo

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत कोरोनाच्या सध्या सुरू असलेल्या लाटेत मृत्युमुखी पडणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ७५ टक्के रुग्णांनी कोरोना लस घेतली नव्हती, अशी माहिती आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी आज दिली. दिल्लीत शुक्रवारी २५ हजारांपेक्षाही कमी रुग्ण नोंदविले जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. गुरुवारी राजधानीत २८,८६७ रुग्णांची नोंद झाली होती. त्याचप्रमाणे, ३१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. कोराना साथ सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक रुग्णसंख्या असून दिल्लीत पॉझिटिव्हिटी दर २९.२१ टक्क्यांवर गेला आहे.

delhi corona
चारचाकी वाहनचालकांसाठी महत्त्वाचे; नितीन गडकरींचा मोठा निर्णय

यापूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील वर्षी एप्रिलमध्ये २८,३९५ रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान, यावर्षी कोरानाच्या सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या लाटेत तीन ते १२ जानेवारीदरम्यान ९७ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ७० जणांनी कोरोना लस घेतली नव्हती. उर्वरित १९ जणांनी लशीचा पहिला डोस घेतला होता तर केवळ आठ जणांनी लशीचे दोन्ही डोस घेतले होते. आरोग्यमंत्री जैन म्हणाले,की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडणाऱ्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांनी लशीचा एकही डोस घेतला नव्हता. सुमारे ९० टक्के रुग्णांना कर्करोग व किडनीच्या आजारासारख्या गंभीर सहव्याधी होत्या. दिल्लीत रुग्णालयात १३ हजार खाटा रिक्त असून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने दिलासा मिळाला आहे.

  • मृत्यू - ९५

  • लस न घेतलेले - ७०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com