युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी रात्रीपर्यंत परतणार; पाठवलं विशेष विमान

युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी रात्रीपर्यंत परतणार; पाठवलं विशेष विमान
Updated on

नवी दिल्ली : युक्रेनमधील स्फोटक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठीच्या मोहिमेत देवदूताची भूमिका बजावणाऱ्या एअर इंडियाचे पहिले विशेष विमान आज रवाना झाले. या 200 आसनी विमानाद्वारे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा पहिला जथ्था आज (ता. २२) रात्री उशिरा साडेअकरापर्यंत नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल, असे सांगितले जाते. ते सव्वादहाला येणं अपेक्षित होतं मात्र, त्यास उशीर होण्याची शक्यता आहे.

युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी रात्रीपर्यंत परतणार; पाठवलं विशेष विमान
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी लिहलं आत्मचरित्र; राहुल गांधी करणार प्रकाशन
युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी रात्रीपर्यंत परतणार; पाठवलं विशेष विमान
कोरोना जिथून पसरला त्या वुहानच्या लॅबचे मालक बिल गेट्स - मेधा पाटकर

एअर इंडियाचे ड्रीमलाइनर बी-७८७ हे विशेष विमान आज सकाळी युक्रेनकडे रवाना झाले. २४ आणि २६ फेब्रुवारीला आणखी दोन विमाने युक्रेनकडे रवाना होणार आहेत. युक्रेनमध्ये १८ हजार विद्यार्थी व अन्य नागरिक मिळून किमान २० हजार भारतीय सध्या रहात असल्याचे तेथील भारतीय दूतावासाने म्हटले आहे. हे सारे मुख्यतः युक्रेनची राजधानी किव्ह आणि आसपासच्या परिसरात रहात आहेत. तेथील भारतीयांची सुखरूप सुटका हा भारताच्या प्राधान्यक्रमावरील सर्वोच्च विषय असल्याचे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतही स्पष्ट केले. प्रत्यक्षात त्या देशातील अनेक भारतीयांनी तेथील वातावरण अद्याप सुरक्षित वाटत असल्याचे म्हटले आहे. युक्रेनवरील रशियाच्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने धडक पावले उचलली आहेत. तेथील भारतीयांना घेऊन येणारे एअर इंडियाचे पहिले विमान किव्हमधील बोरिस्पिल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ नंतर दिल्लीकडे उड्डाण करेल.

युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी रात्रीपर्यंत परतणार; पाठवलं विशेष विमान
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी लिहलं आत्मचरित्र; राहुल गांधी करणार प्रकाशन

‘देवदूत’ एअर इंडिया

‘एअर इंडिया’ने यापूर्वीही अनेकदा देवदूताची भूमिका बजावली आहे. कोरोना संकटात विदेशातील लाखो भारतीयांना मायदेशी आणण्यात एअर इंडियाने मुख्य भूमिका बजावली होती. १९९० मधील इराक-कुवेत युद्धापासून युद्धजन्य परिस्थिती असलेल्या अनेक देशांतील अक्षरशः लाखो भारतीयांना एअर इंडियाने भारतात सुखरूप आणले आहे. इराक युद्धावेळी तर ५९ दिवसांत १० लाख भारतीयांना एअर इंडियाने मायदेशी सुखरूप आणले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com