युद्धामुळे तळीरामांच्या खिशाला कात्री! मद्य कंपन्यांकडून दर वाढीच्या हालचाली, किंमती किती वाढणार?

liquor price hike India मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाची झळ आता भारतातील मद्य उद्योगाला बसू लागली आहे. उत्पादन खर्च वाढल्यानं कंपन्यांनी राज्य सरकारांकडे किंमती वाढवण्याची परवानगी मागितली आहे.
Middle East Conflict Hits Indian Alcohol Industry

Middle East Conflict Hits Indian Alcohol Industry

Esakal

Updated on

Alcohol Companies Seek Permission for Price Hike मध्य पूर्वेतील तणावामुळे जगभरात ऊर्जा संकट अजूनही कायम आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध आता थांबण्याच्या शक्यतेनं दिलासा मिळाला आहे. मात्र युद्धामुळे कच्च्या तेलापासून शेअर बाजारापर्यंत परिणाम दिसून येत आहे. भारतात मद्य उद्योगावरही याचा परिणाम होत आहे. देशातील अनेक मद्य आणि बीअर उत्पादन कंपन्यांनी राज्य सरकारकडे किंमती वाढवण्याची मागणी केलीय. पश्चिम आशियातील संकटामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झालीय. यामुळे बाटली, कॅन, पॅकेजिंग आणि वाहतुकीचा खर्च वाढला आहे. भारतीय बनावटीची परदेशी दारू, बीअर आणि वाईनच्या किंमतीत यामुळे वाढ करावी अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com