कंदाहार अपहरण: कॅप्टननी सांगितला तेंव्हाच्या आणि आताच्या तालिबानमधील फरक

कंदाहार अपहरण: कॅप्टननी सांगितला तेंव्हाच्या आणि आताच्या तालिबानमधील फरक

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबानने ताबा मिळवला आहे. या घटनेनंतर सातत्याने एक अशी बाजू समोर येत आहे की, हा तालिबान नवा असून जुन्या तालिबानप्रमाणे त्याची वर्तवणुक असणार नाही. १९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तानवर तालिबानने सत्ता राबवली होती. त्यावेळी महिला आमि पुरुषांवर कडक असे धार्मिक निर्बंध लादण्यात आले होते. तसेच गुन्ह्यांसाठी क्रूर शिक्षेची तरतूद देखील करण्यात आली होती.

कंदाहार अपहरण: कॅप्टननी सांगितला तेंव्हाच्या आणि आताच्या तालिबानमधील फरक
तालिबानच्या उदयावर पंतप्रधान मोदींचं अत्यंत सूचक विधान

जुना तालिबान विरुद्ध नवा तालिबान

अफगाणिस्तानमध्ये तेंव्हाही तालिबानचीच सत्ता होती, जेंव्हा प्रवाशांनी भरलेले एक भारतीय विमान पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हायजॅक केलं होतं. त्यानंतर ते त्या विमानाला घेऊन कंदाहारला गेले होते. तिथे तालिबाननेच भारत सरकार आणि पाकिस्तान दहशतवाद्यांमध्ये मध्यस्थीची भुमिका निभावली होती. यामध्ये प्रवाशांच्या सुटकेसाठी पाकिस्तानच्या क्रूर दहशतवाद्यांच्या सुटकेची अट भारताला मंजूर करावी लागली होती.

हे सगळं प्रकरण जवळपास सहा दिवसांपर्यंत सुरु होतं. एअर इंडियाच्या ज्या IC 814 विमानाला २४ डिसेंबर १९९९ मध्ये हायजॅक करण्यात आलं होतं, त्यामध्ये कॅप्टन देवी शरण होते. ज्यांनी आपल्या त्यावेळी तालिबानचा अनुभव घेतला आहे.

कंदाहार अपहरण: कॅप्टननी सांगितला तेंव्हाच्या आणि आताच्या तालिबानमधील फरक
इन्स्टाग्राम, फेसबुकने उडवून टाकली राहुल गांधींची 'ती' पोस्ट

त्यावेळचा तालिबान आणि आताचा तालिबान यामध्ये खरंच काही फरक आहे का? याबाबत कॅप्टन शरण सांगतात की, मला असं वाटत नाही. मला जुना तालिबान आणि आताच्या तालिबानमध्ये काहीच फरक जाणवत नाही. ते आजदेखील त्याचपद्धतीने उघड्या जीपमध्ये रॉकेट लाँचर्ससोबत काबूलच्या रस्त्यांवरुन फिरत आहे, जे ते आधीही करायचे. त्यावेळी त्यांनी कंदाहारमध्ये आमच्या विमानाला घेरलं होतं.

त्यांनी पुढे म्हटलंय की, तेंव्हाच्या तालिबान आणि आताच्या तालिबानमध्ये जर काही अंतर असेल तर ते थोडंफार शिक्षणाच्या फरकाचे असू शकते. शक्यता आहे की, आताचा तालिबान थोडाफार सुशिक्षित असेल. ज्या लोकांनी १९९९ मध्ये आमच्या विमानाला घेरलं होतं, ते फार सभ्य नव्हते.

भळभळती जखम आजही...

विमान प्रवाशांच्या सुटकेसाठी त्यावेळी केंद्र सरकारला तीन पाकिस्तानी दहशतवादी - मौलाना मसूद अजगर, अहमद उमर सईद शेख आमि मुश्ताक अहमद जरगर यांची सुटका करुन तालिबानकडे सोपवावं लागलं होतं. अपहरणकर्त्यांनी त्यावेळी एका प्रवाशाची हत्या देखील केली होती. तर अनेकांना जखमी केलं होतं. ही जखम आजही भळभळणारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com