
नवी दिल्ली - कोरोना संसर्गाने भारतासह संपूर्ण जगासमोर आव्हान उभे केले असून अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या विपरीत परिणामांमुळे बालमजुरीचे प्रमाण वाढण्याचीही शक्यता आहे, अशी भीती कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी व्यक्त केली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जागतिक श्रमसंघटनेतर्फे दरवर्षी १२ जून हा दिवस बालमजुरी प्रथा विरोधी दिवस पाळला जातो. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना श्रममंत्र्यांनी बालमजुरी प्रथा रोखण्यासाठी राज्यांची आणि सामाजिक संघटनांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी, श्रम सचिव हिराला समारिया, संयुक्त सचिव कल्पना राजसिंघोत, जागतिक श्रम संघटनेचे संचालक डागमर वॉल्टर यांच्या उपस्थितीत जागतिक बालमजुरी प्रथा विरोधी दिनाचा कार्यक्रम आज झाला.
गंगवार म्हणाले, ‘समाजाचे भविष्य असलेल्या मुलांचे सामाजिक कुप्रथांपासून संरक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात मुलांच्या सुरक्षेप्रती अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.’
‘२०२५ पर्यंत जगातून बालमजुरीचे उच्चाटन करण्याचा संयुक्त राष्ट्र संघाचा निर्धार आहे. २०२१ हे वर्ष आंतरराष्ट्रीय बालमजुरी उच्चाटन वर्ष असेल. भारताला हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आक्रमक प्रयत्नांची गरज असून, राज्यांची आणि सामाजिक संघटनांची भूमिका महत्त्वाची असेल’, असे गंगवार म्हणाले. केंद्राने बालमजुरी संपविण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचे सांगताना कोणत्याही व्यवसायात किंवा प्रक्रिया उद्योगात १४ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे तसेच १४ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये काम करण्यास रोखणे या २०१६ मधील कायदा दुरुस्तीकडे श्रममंत्र्यांनी लक्ष वेधले.
बालमजुरांची स्थिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.