उदयपूरमध्ये नुकतंच नवसंकल्प शिबिर घेतलं. या नवसंकल्प शिबिरातून काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न करण्यासंदर्भात पावलं उचलण्यावर चर्चा झाली. यातूनच आता काँग्रेसने भारत जोडो यात्रेला सुरुवात करणार आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याविषयीची माहिती दिली आहे. (Rahul Gandhi India March)
काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हा यात्रा असेल. येत्या २ ऑक्टोबरपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. स्वातंत्र्यानंतरची काँग्रेसची (Congress) ही पहिलीच भारत यात्रा असेल. या यात्रेच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. एका दिवसात ही यात्रा किती अंतर पार करेल, एकूण किती दिवस लागतील अशा अनेक मुद्द्यांवर विस्ताराने चर्चा होणार आहे.
३,५०० किलोमीटरच्या या यात्रेला ५ ते ६ महिन्यांत पूर्ण करण्याचं काँग्रेसचं नियोजन आहे. प्राथमिक नियोजन प्रतिदिन १० किलोमीटर पदयात्रा पार करण्याचं आहे. मात्र राहुल गांधींना (Rahul Gandhi) हे नियोजन मान्य नाही. त्यांना असं वाटतंय की प्रतिदिन ३५ किलोमीटर पदयात्रा करायला हवी.
या यात्रेचा मार्ग तयार केला जात आहे. मात्र काँग्रेसचं नियोजन अधिकाधिक राज्यांमध्ये जाण्याचं आहे. या यात्रेची सुरुवात कन्याकुमारीपासून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या यात्रेदरम्यान काही सभा आणि अनेक कार्यक्रमही प्रस्तावित आहेत. काश्मीरपर्यंत ही यात्रा जाणार आहे, पण सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगरला जाणार नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.