Coronavirus : कोरोनामुळे मिरची उत्पादक हैराण!

Coronavirus-Chilles
Coronavirus-Chilles

नवी दिल्ली : चीनमधील कोरोना विषाणूच्या प्रसाराचा अर्थकारणावरदेखील विपरीत परिणाम होतो आहे. यामुळे भारताकडून चीनला होणारी मिरचीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना आखत पीडित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. व्ही. पी. रामचंद्रराव यांनी शुक्रवारी (ता.7) शून्य प्रहारादरम्यान राज्यसभेत बोलताना केली. 

भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ‘तेजा’ प्रजातीच्या मिरचीची अन्य देशांना निर्यात करतो. हा निर्यात व्यापार पाच हजार कोटी रुपयांचा आहे. यातील साठ टक्के मिरची ही केवळ चीनमध्ये जाते.

तेलंगण आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांत या मिरचीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. ही मिरची जहाजांच्या माध्यमातूनच अन्य देशांना पाठविण्यात येते. कोरोना विषाणूमुळे व्यापारच ठप्प झाल्याने ही मिरची बंदरांमध्ये तशीच पडून असून, आंध्र आणि तेलंगणमधील शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसला असल्याचे रामचंद्रराव यांनी स्पष्ट केले. 

सरकारने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मिरचीला किमान आधारभूत किंमत मिळेल, याची खात्री द्यावी. साठवणुकीच्या आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच या मिरचीची खरेदी करावी आणि परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर शेतकऱ्यांना विम्याचे कवच द्यावे, अशा मागण्याही रामचंद्रराव यांनी राज्यसभेत बोलताना केल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com