Rajnath Singh: "...तर भारत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार करेल"; का दिला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इशारा?

Rajnath Singh: राजनाथ सिंह यांचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजण्याची शक्यता आहेत. भारतीय यंत्रणांनी परदेशात जाऊन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमसमूह गार्डियनने केल्यानंतर सिंह यांनी इशारा दिला आहे.
Rajnath Singh
Rajnath Singhesakal

Rajnath Singh:  देशाची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना सरकार सोडणार नाही आणि ते पाकिस्तानात लपून बसले असले तरी त्यांना जबाबदार धरले जाईल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सांगितले.

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संरक्षण मंत्री म्हणाले, आपल्या शेजारी देशातून आलेल्या कोणत्याही दहशतवाद्याने भारताला त्रास दिला किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा येथे दहशतवादी कारवाया केल्या तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ. जर तो पाकिस्तानात पळून गेला तर आपण पाकिस्तानात घुसून त्याला ठार करू.

भारतीय यंत्रणांनी परदेशात जाऊन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमसमूह गार्डियनने केल्यानंतर खळबळ उडाली असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘‘दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारले जाईल’’ असे आज ठणकावून सांगितले. त्यांच्या या विधानानंतर आता लोकसभा निवडणुकीमध्ये हा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत.

Rajnath Singh
RAW Agents in Pakistan: पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करतोय भारत, पुलवामानंतर अधिक आक्रमक; 'दि गार्डियन'चा दावा

गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानात काही दहशतवाद्यांचा अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यात भारतीय गुप्तहेर यंत्रणांचा हात असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

कॅनडा आणि अमेरिकेनेही देखील खलिस्तानी दहशतवाद्यांवरील हल्ल्यांमागे भारतीय यंत्रणा असल्याचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर गार्डियन वृत्तपत्रातील लेखात म्हटले आहे की, इस्त्रायली गुप्तहेर संस्था मोसादच्या धर्तीवर भारतानेही अन्य देशांमध्ये जाऊन दहशतवाद्यांचा ठार केले आहे. यात भारतीय यंत्रणांनी पाकिस्तानमध्ये जाऊन २० दहशतवाद्यांना टिपले असल्याचाही उल्लेख आहे.

दरम्यान, राजनाथसिंह म्हणाले, ‘‘शेजारील देशातून येऊन कोणी भारतात दहशतवादी कृत्य करत असेल तर सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल आणि  कोणी पळून पाकिस्तानात जात असेल तर पाकिस्तानात घुसून मारले जाईल.’’

Rajnath Singh
Narendra Modi 3.0: मंत्रालयांची संख्या कमी होणार, वृद्धांचे पेन्शन वाढणार! काय आहे मोदींचा 3.0 प्लॅन? अधिकारी व्यस्त...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com