एनडीआरएफच्या पथकानं आज सकाळी चौघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
दिल्लीतील (Delhi) रोहिणी भागात मंगळवारी सायंकाळी गटारात अडकलेल्या चार जणांना सर्व प्रयत्न करूनही वाचवता आलं नाहीय. एनडीआरएफच्या (NDRF) पथकानं आज सकाळी चौघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. गटारातून जाणारी टेलिफोन केबल दुरुस्त करण्यासाठी संजय गांधी ट्रान्सपोर्ट (Sanjay Gandhi Transport) नगरमध्ये दाखल झालेले तीन मजूर अडकले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेला रिक्षाचालकही गटारात अडकला. एनडीआरएफच्या टीमनं रात्रभर बचावकार्य केलं. मात्र, कोणालाही वाचवता आलं नाहीय.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रोहिणी सेक्टरमधील गटारातून टेलिफोन केबल जात आहे. या केबल्समध्ये बिघाड झाल्याची तक्रार होती. बिघाड दुरुस्त करण्याचे कंत्राट जनकपुरीतील एका खासगी कंपनीला देण्यात आलंय. पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, मंगळवारी सायंकाळी पर्यवेक्षक सूरज साहनी, बच्चू आणि पिंटू या दोन मजुरांसह दुरुस्तीसाठी घटनास्थळी गेले होते. सुमारे 15 फूट खोल गटाराचे झाकण काढून बच्चू व पिंटू आत शिरले. गटारात टेलिफोनशिवाय विजेच्या ताराही होत्या. बराच वेळ गेल्यानं सूरज त्यांना पाहण्यासाठी गटारात शिरला. पण, तो स्वतःच आत अडकला.
यादरम्यान तिथं उभ्या असलेल्या रिक्षाचालक सतीश यानं हा अपघात पाहिला. त्यांचा जीव वाचवण्यासाठी तो गटारात शिरला. एक-एक करून चार जण गटारात अडकल्यानं एकच खळबळ उडाली. सायंकाळी 6.30 च्या सुमारास या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. यानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आणि एनडीआरएफच्या टीमनं रात्रभर बचावकार्य केलं. मात्र, कोणालाही वाचवता आलं नाहीय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.