नवी दिल्ली : आज सायंकाळी सहा वाजता केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये फेरबदल होणार आहेत, यानुसार मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्याआधीच अनेक मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. यामध्ये डॉ. हर्षवर्धन, रमेश पोखरियाल निशंक, संतोष गंगवार, संजय धोत्रे, बाबुल सुप्रियो, रावसाहेब दानवे पोटील, सदानंद गौडा, रतनलाल कटारिया, प्रताप सारंगी, देबोश्री चौधरी आणि थावरचंद गहलोत यांचा समावेश आहे.
या साऱ्या राजीनाम्यांच्या नावांमधील केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचं नाव अधिक हैराण करणारं आहे. त्यांच्या या राजीनाम्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. पहिला महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे कोरोना विरोधातल्या लढाईदरम्यान चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य खात्याला अपयश आल्याचं मोदी सरकारने मान्य केलंय का? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरच हा राजीनामा घेतला गेलाय का?
पहिल्या लाटेनंतर मोठ्या प्रमाणावर अतिआत्मविश्वासाने केंद्र सरकारने अनेक विधाने केली होती. हा लढा आपण जिंकलाच आहे, असा सरकारचा आणि एकूण आरोग्य खात्याचा सूर होता. मात्र, दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा अधिक नुकसान झाल्याचं आढळून आलं. हे एकप्रकारे सरकाचं अपयशच म्हणता येईल. आता डॉ. हर्षवर्धन यांनी राजीनामा दिल्याने देशाला नवा आरोग्यमंत्री मिळेल. त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे की, तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीसाठी सरकार कशापद्धतीने नव्या आरोग्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणार आहे. नवे आरोग्यमंत्री कोण असतील, याबाबत मात्र अद्याप खुलासा झाला नाहीये.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.