

दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. नागपूरमधील RSS कार्यालय, मुंबईतील संवेदनशील ठिकाणे
esakal
Delhi Bomb Blast Maharashtra High Alert : दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्रात सुरक्षा यंत्रणांनी संवेदनशील स्थळी गस्त आणि तपासणी वाढवली असून नागपूर ते मुंबईपर्यंतच्या संघटनात्मक आणि सार्वजनिक ठिकाणांवरही विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पुणे आणि कोल्हापूरमध्ये महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी पोलिस बंदोबस्त कडक केला गेला आहे, नाका तपासणी आणि रस्ते गस्त वाढवण्यात आल्या असून सर्व सुरक्षा एजन्सी घटनास्थळी मिळून घटनेचा सखोल अभ्यास व त्वरित तपास करत आहेत. नागरिकांनी संयम राखण्याचे आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.