

नवी दिल्ली, ता.२५ (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वे गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहे. वंदे भारतसारख्या वेगवान गाड्या सुरू केल्या. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असून आता देशातील पहिला हायपरलूप चाचणी मार्ग तयार झाला आहे. यामुळे ३५० किलोमीटरचे अंतर केवळ ३० मिनिटांत कापता येऊ शकत. म्हणजेच पुणे ते मुंबईला जाण्यासाठी हायपरलूपने साधारण १५ ते २० मिनिटे वेळ लागेल.