Ukraine : ''गरज पडल्यास भारतीयांसाठी वायुसेनेची मदत घेऊ''

Ukraine : ''गरज पडल्यास भारतीयांसाठी वायुसेनेची मदत घेऊ''

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचा आजचा पाचवा दिवस आहे. युद्धाची सुरुवात झाल्यानंतर युक्रेनने त्यांचे हवाई क्षेत्र सुरक्षेच्या कारणास्तव बंद केले आहे. यामुळे हजारो भारतीय विद्यार्थ्यी युक्रेनमध्ये अडकून पडले असून, मिशन गंगा अंतर्गत केंद्र सरकार विशेष विमान सेवा चालवत आहे. दरम्यान, गरज पडल्यास भारतीयांना युक्रेनमधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्ही भारतीय हवाई दलाचीही मदत घेऊ असे विधान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केले आहे. (If Needed We Will Take Help Of Indian Air Force In Ukraine )

झेलेन्स्कींना संपवण्यासाठी रशियाने पाठवले 400 भाडोत्री मारेकरी

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध सलग पाचव्या दिवशीही सुरूच असून, रशियाच्या हल्ल्याला युक्रेनच्या सैनिक मोठ्या हिमतीने तोंड देत आहेत त्यामुळे आपल्या सैन्यबळाच्या जोरावर अवघ्या काही दिवसांत युक्रेनवर पूर्ण ताबा मिळवण्याचा विचार करणाऱ्या रशियाच्या स्वप्नांवर विरझण पडले आहे. या सर्व घडामोडींमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zhelensky) यांनी एक मोठे विधान केले असून, आपल्या हत्येसाठी रशियाने 400 भाडोत्री मारेकऱ्यांना युक्रेनची राजधानी किवमध्ये तैनात केले आहे. ब्रिटिश वृत्तपत्र द टाइम्सने या वृत्ताबाबत दावा केला आहे. (Russia Ukraine War Latest News In Marathi)

झेलेन्स्की म्हणाले की, रशियाने आमच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याला आम्ही सर्वजण खंबीरपणे लढा देत आहोत. दरम्यान, रशियाने आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला असून, यासाठी युक्रेनची राजधानी कीवमध्ये 400 भाडोत्री सैनिक तैनात करण्यात आले आहेत, या सर्वांना झेलेन्स्की यांच्या हत्येचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर या सैनिकांना झेलेन्स्कींच्या सरकारला अस्थिर करण्याचेही काम देण्यात आले असल्याचे सांगितले जात असून, रशियन विमानांसाठी युरोपचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. त्याचा रशियन अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे.

Ukraine : ''गरज पडल्यास भारतीयांसाठी वायुसेनेची मदत घेऊ''
युद्धाने होरपळणाऱ्या युक्रेनमध्ये आता नवे संकट; WHO ने व्यक्त केली चिंता

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने आज सांगितले की, "संकटग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी देशाच्या पश्चिम भागाकडे (युक्रेन) जाण्याचा प्रयत्न करावा. आसपासच्या भागात राहून थेट सीमेवर पोहोचू नये." शिवाय, रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाच्या पहिल्या अ‍ॅडवाइजरीनंतर 8,000 हून अधिक भारतीयांनी युक्रेन सोडल्याचा अंदाज आहे. बागची पुढे म्हणाले, "ऑपरेशन गंगा अंतर्गत 6 फ्लाइट्सद्वारे आतापर्यंत 1,396 विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com