

INDIA alliance leaders
esakal
नवी दिल्ली: ‘नीट’ आणि ‘सीबीएसई’ परीक्षांच्या गैरव्यवस्थापनावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करून विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने केंद्रातील भाजप आघाडीच्या सरकारविरोधात आक्रमकपणे लढण्याचा निर्धार सोमवारी जाहीर केला. त्याचप्रमाणे मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेपासून ते बेरोजगारी, महागाई यावरूनही सरकारला कोंडीत पकडण्याच्या रणनितीवर विरोधकांनी सहमती दर्शविली.