
पाकिस्तानने पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने त्याचं उत्तर म्हणून पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. त्यानंतर पुन्हा पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्याने भारताने उत्तराखातर पाकिस्तानच्या मुख्य शहरांना टार्गेट केलं. आता भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं असून दोन्हीकडून गोळीबार सुरू आहे. भारताने पाकिस्तानला दणका देत त्यांचे ड्रोन्सदेखील पाडले. पाकिस्तानी चौक्या उध्वस्त केल्या. पाकिस्तानच्या कुरापतींना उत्तर देताना भारताने त्यांना सळो की पळो कारून सोडलंय. मात्र या युद्धात भारताचे दोन जवान धारातीर्थी पडलेत. युद्धात भारताच्या आणखी एक जवानाला वीरमरण आलं आहे.