राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले, लवकर वेळ काढून राजभवनावर या

Jagdeep Dhankhar wrote letter to Mamata Banerjee
Jagdeep Dhankhar wrote letter to Mamata BanerjeeJagdeep Dhankhar wrote letter to Mamata Banerjee

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना बीरभूम हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी राजभवनात आमंत्रित केले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात, राज्यपालांनी अलीकडील घटना चिंताजनक असल्याचे म्हटले आणि लवकरात लवकर चर्चेसाठी वेळ काढण्यास सांगितले. (Jagdeep Dhankhar wrote letter to Mamata Banerjee)

अलीकडील चिंताजनक घडामोडी अराजकता आणि हिंसाचार वाढवतात. अशा परिस्थितीत राजभवनात संभाषणासाठी तुम्ही लवकरात लवकर वेळ काढणे गरजेचे आहे. राज्यघटना आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून, रामपुरहाट आणि विधानसभेत नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे राज्यातील आधीच ढिसाळ कारभार अधिक तणावपूर्ण बनला आहे, असे धनखर यांनी ममता बॅनर्जींना लिहिलेल्या पत्रात म्हटले.

Jagdeep Dhankhar wrote letter to Mamata Banerjee
मुलीवर बलात्कार करणाऱ्याचे वडिलांनी केले तुकडे; नदीत फेकले

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दार्जिलिंगमध्ये तळ ठोकून आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रीय एजन्सीला सहकार्य करेल. परंतु, सीबीआयने भाजपच्या इशाऱ्यावर काही केले तर त्यांचा पक्ष निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दिला होता. धनखर यांनी पत्रात ममता बॅनर्जींच्या या विधानावर चिंता व्यक्त केली आहे.

घटनेचा सीबीआय तपास कलकत्ता उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली केला जात आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या (BJP) पाच आमदारांचे उर्वरित अधिवेशनातून निलंबनाच्या एका दिवसानंतर राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी राज्यपालांवर भाजपचे प्रतिनिधित्व केल्याचा आरोप केला आहे.

Jagdeep Dhankhar wrote letter to Mamata Banerjee
‘देवेंद्र फडणवीस हे मुंबई, दिल्लीच्या राजकारणात रमले; त्यांनी...’

पश्चिम बंगालमधील स्थिती चांगली

बहुतेक राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली असल्याचे टीएमसीचे मत आहे. ज्या काही तुरळक घटना घडल्या आहेत, त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाई केली आहे. राज्यपालांना (Jagdeep Dhankhar) माहीत आहे की भाजपला जनतेचा पाठिंबा कमी झाला आहे. त्यामुळे ते सरकारला बदनाम करण्यासाठी मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही कुणाल घोष म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com