Monsoon to Reach Andaman in 24 Hours
esakal
गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, या उष्णतेपासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, येत्या २४ तासांत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यंदा मान्सूनचा वेग चांगला असून तो नेहमीपेक्षा जलद गतीने भारताकडे सरकत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.