Neem Karoli Baba : भारताचा अध्यात्माशी जवळचं नातं आहे. इथे संत, ऋषी आणि योगींच्या अनेक अद्भूत, चमत्कारीक कथा प्रचलीत आहे. अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी परदेशी लोक भारतात येतात. असेच एक जागतिक प्रसिद्धीचे संत म्हणजे नीम करोली बाबा. त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्याचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. बाबा म्हणतात की, माणसाच्या जीवनात चांगले दिवस येणार असतील त्याचे अनेक संकेत त्याला मिळतात.
पशू-पक्षी घरात येणं
जर तुमच्या घरात अचानक पशू-पक्षी येत असतील तर समजून जा की, लवकरच काही शुभ बातमी मिळणार आहे.
साधू-संत दिसणे, भेटणे
जर तुम्हाला अचानक कोणी साधू-संत भेटले तर समजा की, तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. साधू-संतांचं येणं म्हणजे तुमच्यावर देवी-देवतांची कृपादृष्टी असणार आहे. आणि नशिब तुमची साथ देणार आहे.
डोळ्यांच अश्रू येणे.
जर तुम्ही कुठे भजन-किर्तनाला गेले आणि भक्तीत तल्लीन झालेले असताना जर तुमच्या डोळ्यांत अश्रू आले तर समजा की, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. आता सर्व अडचणी दूर होणार. भक्ती करताना डोळ्यांत अश्रू येणे शुभ संकेत समजले जातात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.