तीन दिवस ताप नसेल, तर कोरोनाची चाचणी नाही

घरी सोडण्याच्या धोरणात बदल
Corona Test
Corona Testsakal

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना रुग्णांना(corona patient) रुग्णालयातून घरी सोडण्याबाबतच्या धोरणात मोठा बदल केला आहे. अगदी सौम्य लक्षणे असलेल्या ज्या रुग्णांना सलग तीन दिवस ताप आलेला नसेल त्यांना घरी सोडताना त्यांची पुन्हा कोरोना चाचणी केली नाही तरी चालेल, अशी सवलत देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जाहीर केले.(If there is no fever for three days then no corona test)

Corona Test
कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर

सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना सात दिवसांनंतर घरी सोडण्याची मुभा रुग्णालयांना असेल, असेही केंद्राने स्पष्ट केले. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली व त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढले (ऑक्सिजन न लावता सलग ३ दिवस ऑक्सिजन पातळी ९३ च्या वर असेल) तर त्यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देता येईल, असेही केंद्राने स्पष्ट केले. दरम्यान ,महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ व गुजरात या राज्यांत सध्याच्या लाटेत संक्रमण दर अजूनही जास्त आहे. हा चिंतेचा विषय असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

Corona Test
रोजगार एवढा देऊ की कॅनडाहून शीख परततील: केजरीवाल

महाराष्ट्र, बंगालमुळे काळजी

राष्ट्रीय माध्यम केंद्रात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की महाराष्ट्र व बंगालमधील वाढीव संक्रमण दर अजूनही कमी होत नाही हे काळजीचे कारण आहे. दोन्ही राज्यांशी केंद्रीय यंत्रणा सातत्याने संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

जगभरात वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत तो कायम जीवघेणा ठरत नाही, असे जागतिक परिस्थिती सांगते आणि ही दिलासादायक बाब असल्याचे सांगून अग्रवाल म्हणाले, की ओमिक्रॉन संक्रमणामुळे जगभरात आतापावेतो केवळ ११५ जणांनी प्राण गमावले आहेत व तिसरी लाट सुरू झाल्यापासून भारतात केवळ एका जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

Corona Test
पंजाब : 'आप'चा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार शीख असेल - केजरीवाल

मास्क वापरा, सुरक्षित अंतर पाळा

ओमिक्रॉन(omicron) हा अत्यंत वेगाने पसरणारा असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटना वारंवार देत आहे. त्यामुळे देशात प्रत्येकाने आरोग्य नियमांचे अत्यंत काटेकोर पालन करावे. मास्क लावणे व सुरक्षित अंतर पाळणे याबाबत बेपर्वाईने वागून इतरांचे जीव धोक्यात आणू नयेत, असे पुन्हा आवाहन संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com