ईडीकडून राहुल गांधींची कसून चौकशी; 'यंग इंडियन'बाबत केला खुलासा

यंग इंडियन ही नफा नसलेली कंपनी असून, कायद्याच्या विशेष तरतुदीनुसार स्थापन करण्यात आली आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज सलग तिसऱ्या दिवशी ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना उलट सुलट प्रश्न विचारले. यावेळी आपण यंग इंडियनमधून (Young Indian Pvt. Ltd) एकही पैसा काढला नसल्याचे उत्तर दिले आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. याबाबत इंडिया टुडेने वृत्त प्रकाशित केले आहे. (Rahul Gandhi ED Inquiry)

Rahul Gandhi
‘सोनिया गांधी व राहुल गांधी यांना काहीही झाले तर देश पेटेल’

राहुल गांधींची ईडीची चौकशी नॅशनल हेराल्डची (Nationa Herald Case) मालकी असलेल्या काँग्रेसने प्रवर्तित यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडमधील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित आहे. हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडद्वारे (AJL) प्रकाशित केले जाते आणि यंग इंडियनच्या मालकीचे आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांना सांगितले की, यंग इंडियन ही नफा नसलेली कंपनी असून, जी कंपनी कायद्याच्या विशेष तरतुदीनुसार स्थापन करण्यात आली आहे. त्यातून आपण एक पैसाही काढलेला नाही. या उत्तरानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधींच्या या दाव्यावर प्रतिप्रश्न उपस्थित केला. संबंधित कंपनी 2010 मध्ये स्थापन झाल्यापासून एखादं समाजकार्य केले असेल तर, त्या संबंधित कागदपत्रं आणि पुरावे सादर करावे असे सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Rahul Gandhi
नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राचा इतिहास देशाच्या स्वातंत्र्याशी जोडला गेलाय

वादाची सुरुवात कुठून झाली?

२०१० मध्ये एजेएलचे १,०५७ भागधारक होते. नुकसान होत असताना त्याचे होल्डिंग यंग इंडियन लिमिटेड म्हणजेच वायआयएलकडे हस्तांतरित करण्यात आले. यंग इंडियन लिमिटेडची स्थापना २०१० मध्ये झाली. यामध्ये काँग्रेसचे तत्कालीन सरचिटणीस राहुल गांधी (Rahul Gandhi) संचालक म्हणून सामील झाले. राहुल गांधी आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची कंपनीत ७६ टक्के भागिदारी आहे. उर्वरित २४ टक्के काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस (दोघेही निधन झाले आहेत) यांच्याकडे होते.

अनेक भागधारकांनी केला आरोप

माजी कायदा मंत्री शांती भूषण, अलाहाबाद आणि मद्रास उच्च न्यायालयांचे माजी मुख्य न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांच्यासह भागधारकांनी आरोप केला की वायआयएलने एजेएल अधिग्रहित केले तेव्हा कोणतीही सूचना दिली नाही. शेअर्सचे हस्तांतरण करण्यापूर्वी भागधारकांची संमतीही घेतली नाही. शांती भूषण आणि मार्कंडेय काटजू यांच्या वडिलांचे एजेएलमध्ये शेअर्स होते, हे विशेष...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com