महत्त्वाची बातमी : ‘आरबीआय’ने बदलला आर्थिक वर्षाचा कालावधी!

RBI
RBI

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आर्थिक वर्षात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता.२३) नवी दिल्ली येथे आरबीआयच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

आर्थिक वर्ष २०२१-२०२२ ची सुरुवात आता १ एप्रिल रोजी होणार आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० आता चालू वर्षात ३० जून, २०२० रोजी संपुष्टात येणार आहे, तर आर्थिक वर्ष २०२०-२१ ची सुरुवात १ जुलै रोजी सुरू होईल, मात्र ३१ मार्च २०२१ रोजी ते संपुष्टात येईल. त्यानंतर पुढील सर्व आर्थिक वर्षाची सुरुवात १ एप्रिलपासूनच होणार आहे. 

आतापर्यंत आरबीआय आणि सरकार टी+१ पद्धतीचा अवलंब करतात. म्हणजे आर्थिक वर्ष दोन वर्षांत विभागले जातात. सरकारचे आर्थिक वर्ष १ एप्रिल रोजी म्हणजे ‘टी’ला (पाहिले वर्ष) सुरू होते, तर मार्च ३१ ला टी+१ ला (दुसरे वर्ष) संपते. तर आरबीआयसाठी ते १ जुलैला सुरू होते आणि दुसऱ्या वर्षात ३० जून रोजी संपते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com