पिझ्झा घरपोच मग धान्य का नाही, म्हणणाऱ्या केजरीवालांना केंद्राच्या कानपिचक्या

Arvind Kejriwal
Arvind KejriwalFile photo

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये घरपोच धान्य वितरण करण्यावरून केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारमध्ये जुंपली आहे. सध्याच्या काळात पिझ्झा घरपोच येतो, तर रेशनचे धान्य का नाही, असा सवाल केजरीवाल सरकारने केला आहे. केंद्राने घरपोच धान्य योजनेस परवानगी दिली नसल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, केंद्राने केजरीवाल यांना कानपिचक्या देत दिल्ली सरकारने स्वत: धान्य खरेदी करून ते घरपोच द्यावे, अशी भूमिका घेतली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घरपोच रेशन धान्य योजनेची राष्ट्राच्या हितासाठी अंमलबजावणी करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. ही योजना देशभरात राबवावी. अन्यथा रेशन धान्य दुकाने कोरोना संसर्गाची ठिकाणे बनतील. त्यासाठी आम्ही ही योजना राबविण्यास नायब राज्यपालांकडे परवानगी मागितली होती. परंतु ती त्यांनी नाकारली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. ही योजना लागू केल्यास दिल्लीतील रेशन धान्य माफियांचा विश्‍व संपुष्टात येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देखील या प्रकरणी भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘‘रेशनवरील धान्य घरपोच मिळू लागले, तर भाजप नेत्यांची काळी कमाई बंद होईल. त्यांना केवळ केजरीवाल यांना शिव्या द्यायच्या आहेत.’’

Arvind Kejriwal
योगी आदित्यनाथांसाठी कठीण काळ?

भाजपची टीका

केजरीवाल सरकारने केंद्र सरकावर आरोप केल्यानंतर भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी लगेचच केजरीवाल यांच्यावर तोंडसुख घेतले. केंद्र सरकार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत देशभरात स्वस्त धान्य पुरविते. सर्वांसाठी ही समान योजना आहे. त्यासाठी केंद्र सरकार गव्हासाठी २३.७३ रुपये आणि तांदळासाठी ३३.७९ रुपये देते. या धान्यासाठी दिल्ली सरकार केवळ दोन आणि तीन रुपये देते. हे धान्य केजरीवाल यांना घरपोच द्यायचे आहे; पण हे देता येणार नाही, त्यांना धान्य द्यायचे असेल, तर त्यांच्या सरकारने विहित दरानुसार खरेदी करावे आणि त्यांनी राज्याची योजना करून त्याद्वारे घरपोच वितरित करावे. त्यांना केंद्र सरकार अडवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

केजरीवाल यांना कोट्यवधी रुपये जाहिरातीवर खर्च करायचे आहेत आणि धान्य मात्र केंद्राने पाठविलेले घरपोच द्यायचे आहे. त्यांनी जाहिरातीवरचा खर्च वाचविला असता, तर धान्याबरोबर फळेही ते घराघरांत पोचवू शकले असते.

- संबित पात्रा, भाजप प्रवक्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com