

Bullet Train Network to Slash Travel Time Across India
भारतीय रेल्वेकडून देशातील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी हाय स्पीड नेटवर्क योजना तयार केलीय. या योजनेअंतर्गत १६ लाख कोटींचा खर्च करून हाय स्पीड नेटवर्क उभारलं जाणार आहे. यामुळे दिल्ली ते सिलीगुडी हे अंतर फक्त ६ तासात तर मुंबई - पुणे फक्त ४८ मिनिटात गाठता येणार आहे. केंद्र सरकारकडून या प्रकल्पाची तयारी केली जात असून अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाही.