Raksha Bandhan 2023: स्वातंत्र्यलढ्यात राखी बनली होती प्रमुख हत्यार, गुरुदेव टागोरांचे आहे मोठे योगदान

रक्षाबंधनाचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही खुप मोठे योगदान आहे.
Raksha bandhan
Raksha bandhansakal

Raksha Bandhan Festival : रक्षाबंधन हा ब भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे.पण रक्षाबंधनाचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही खुप मोठे योगदान आहे. कारण रक्षाबंधनने भारताची एकात्मता टिकवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Raksha bandhan
National Flag: ५ झेंड्यांनंतर सध्याचा तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून झाला फायनल

ही घटना आहे १६ ऑक्टोबर १९९५ ची. रक्षाबंधन होऊन एक महिना अधिक झाला होता. रविंद्रनाथ टागोर यांनी पहाटे गंगेत स्नान करून आपल्या दिवसाची सुरुवात केली होती आणि लोकांना मिरवणुकीसाठी बोलावले होते. वाटेत सापडलेल्यांना राखी बांधणे हा मिरवणुकीचा उद्देश होता. त्याच्यासोबत राख्यांचे बंडल होते. परंतू या मिरवणूकीचा भाऊ बहिणीशी काही एक संबंध नव्हता. हे रवींद्रनाथ टागौर यांनी हिन्दू-मुस्लिम एकता म्हणून आवाहन करत होते. त्यांनी हिंदू मुस्लिम लोकांना आवाहन केले होते की इंग्रजांच्या बोलण्यात येऊ नका. एकमेकांना राखी बांधा आणि शपथ घ्या की तुम्ही कधीही वेगळे होणार नाही आणि एकमेकांसाठी समोर येणार.

सणांचे महत्त्व तारखेनुसार नसते त्यासाठी भावना महत्त्वाच्या असतात. त्यामुळेच 16 अक्टूबर 1905 ला टागोर यांनी रक्षाबंधन साजरी केली.

Raksha bandhan
National Flag: जाणून घ्या, तिरंगा फडकवण्याचे 'हे' नियम

भारताच्या ईशान्येकडील भागात सध्याचे आसाम, ओडिशा, बांगलादेश आणि बिहार यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे त्यांचे व्यवस्थापण करणे इंग्रजांना कठीण वाटत होते. त्यामुळे या भागांची दोन स्वतंत्र राज्यांमध्ये विभागणी करावी, असा त्यांचा विचार होता. ब्रिटीश हिंदू मुस्लिम नुसार विभागणी करत होते कारण बंगालचा पूर्व भाग मुस्लिम बहुसंख्य होता आणि पश्चिम भागात हिंदू समाजाचे वर्चस्व होते.

Raksha bandhan
National Flag: PM मोदींनी डीपीला लावला तिरंगा; जनतेलाही केलं आवाहन

या फाळणीच्या विरोधात देशभरात आंदोलने झाली. पण ती फाळणी थांबवण्यासाठी टागोरांनी रक्षाबंधनला नवे महत्त्व दिले.रक्षाबंधन हा बहिण भावाचा फक्त सण नाही तर प्रत्येक नागरिकांचा एकमेकांप्रती रक्षा करण्याचा सण आहे.या दिवशी तुम्ही एकमेकांची रक्षा करण्याची शपथ घेऊ शकता, मग ती रक्षा हिंदू मुस्लिम धर्माच्या एकतेची रक्षा का नसो, अशा आशयातून रविंद्रनाथ टागोर यांनी हे आंदोलन केले होते, ज्याची इतिहासात नोंद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com