सरकारने भारताच्या युवा वर्गाचे भविष्य संपवले, राहुल गांधींची टीका

एकीकडे बेरोजगारी, दुसरीकडे महागाई...
Rahul Gandhi
Rahul Gandhiesakal

उदयपूर : सरकारने भारताच्या युवा वर्गाचे भविष्य संपवले आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर केली आहे. उदयपूर येथील पक्षाच्या नव संकल्प चिंतन शिबीरात आज रविवारी (ता.१५) ते बोलत होते. पुढे राहुल गांधी म्हणाले, एकीकडे बेरोजगारी, दुसरीकडे महागाई, युक्रेनमध्ये युद्ध झाले आहे. आगामी काळात चलनवाढीवरही त्याचा परिणाम होईल. (Rahul Gandhi Attack On Modi Government Over Youth Politics)

Rahul Gandhi
प्रियंका गांधी काँग्रेस अध्यक्ष होणार? नेत्यांच्या मागणीमुळे चर्चा

काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला आहे, की ऑक्टोबर महिन्यात पूर्ण काँग्रेस पक्ष (Congress Party) हा जनतेमध्ये जाऊन दौरा करणार आहे, या शब्दात त्यांनी भविष्यातील पक्षाचे धोरण सांगितले. जनतेबरोबर जे नाते काँग्रेसशी होते, ते पुन्हा नव्याने स्थापित केले जाईल. हे शाॅर्टकटने होणार नाही. त्यासाठी घाम गाळूनच काम करावे लागेल, असा सल्ला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला.

Rahul Gandhi
Latur Accident | अहमदपुरात कारच्या धडकेत तरुण ठार, एक जण गंभीर जखमी

आपल्याला विचार न करता जनतेत जाऊन बसावे लागेल. त्यातून त्यांच्या समस्या कळतील व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपले जनतेबरोबर जे कनेक्शन होते ते पुन्हा बनवावे लागेल. जनता जाणून आहे, की काँग्रेस पक्षच देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com