Rajnath Singh: "...तर आम्ही मदत करायला तयार," संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची पाकिस्तानला खुली ऑफर

Rajnath Singh On Pakistan: ते म्हणाले, "आम्ही दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत कोणतीही कारवाई करू देणार नाही. त्यांना रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू."
Rajnath Singh
Rajnath Singhesakal

Rajnath Singh Ready To Help Pakistan To End Terrorism:

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पाकिस्तानला मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या मदतदीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. एका पॉडकास्टमध्ये संवाद साधताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला जर दहशदवाद संपवायला आमची मदत हवी असेल तर आम्ही त्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

“पाकिस्तानला अशक्य वाटत असेल तर भारत त्यांना दहशतवाद रोखण्यासाठी सहकार्य करण्यास तयार आहे,” असे म्हणत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दहशतवादाचा सामना करण्यासाठी मदत देऊ केली.

"पाकिस्तान दहशतवादाच्या मदतीने भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. पाकिस्तानला दहशतवादावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. जर पाकिस्तानला असे वाटत असेल की, ते त्यावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम नाहीत, तर ते भारताची मदत घेऊ शकतात. भारत पाकिस्तानला दहशतवाद थांबवायला मदत करायला तयार आहे. ते आमचे शेजारी आहेत आणि जर त्यांचा हेतू स्पष्ट असेल की, दहशतवाद थांबला पाहिजे, तर त्यांनी ते स्वतः करावे, अन्यथा ते भारताची मदत घेऊ शकतात आणि दोन्ही देश मिळून दहशतवाद संपवू शकतो," या शब्दात राजनाथ यांनी पाकिस्तानला सल्लावजा इशारा दिला.

Rajnath Singh
Surgical Strike: "दहशतवाद्यांना त्यांच्याच घरात घुसून मारले," सर्जिकल स्ट्राईकचा संदर्भ देत आणखी काय काय म्हणाले PM Modi

नुकत्याच एका टीव्ही मुलाखतीत केलेल्या 'घुस के मरेंगे' या वक्तव्याबद्दल विचारले असता, राजनाथ सिंह म्हणाले की, भारत दहशतवादाचा सामना करण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करेल.

ते म्हणाले, "आम्ही दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत कोणतीही कारवाई करू देणार नाही. त्यांना रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू."

जम्मू-काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सप्टेंबर २०१६ मध्ये भारताने नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांवर सर्जिकल स्ट्राइक केला होता. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर हवाई हल्ले केले होते.

Rajnath Singh
Election on Ballot Paper: प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी मतदान यंत्राऐवजी ‘या’ ठिकाणी बॅलेट पेपरवर झाली निवडणूक; नेमकं काय घडलं?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप नेत्यांची विधाने आक्रमक होत आहेत का, या प्रश्नावर ते म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारची भूमिका कधीही आक्रमक नव्हती.

ते म्हणाले, “प्रत्येक मुद्द्यावर आमचा समतोल दृष्टिकोन आहे."

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 7 एप्रिल रोजी सांगितले होते की, देश सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करताना सर्व अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा धोक्यांना तोंड देण्यासाठी सक्षम आणि सुसज्ज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com