भाजपने 'सबका साथ' नाही 'सबका सर्वनाश' केला; ममता बॅनर्जी भडकल्या!

Mamata-Amit-Shah
Mamata-Amit-Shah

कोलकता : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून आक्रमक झालेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (ता.18) पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून ममता बॅनर्जी यांनी आक्रमक भूमिका घेत ''तुम्ही हा कायदा पश्‍चिम बंगालमध्ये कसा लागू करता ते मी पाहते. भाजपने 'सबका साथ, सबका विकास' नाही, तर सबका सर्वनाश केला आहे,'' अशी घणाघाती टीका केंद्र सरकारवर केली आहे. 

सोमवार आणि मंगळवार या दोन लागोपाठ दिवशी आंदोलन केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी बुधवारीही हावडा मैदानावरून रॅली काढली. या रॅलीत बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.

यावेळी ममता म्हणाल्या, की केंद्रीय गृहमंत्र्यांचे काम हे आग विझवण्याचे असते. मात्र, नागरिकत्व कायद्यावरून त्यांनी देशामध्ये आग लावण्याचे काम केले आहे. कायद्यात आवश्‍यक बदल करा आणि देशाला जळू देऊ नका, असे आवाहन त्यांनी शाह यांना केले आहे. 

तसेच, भाजप संपूर्ण देशाला ताब्यात घेऊन पाहत आहे. पण आम्ही तस होऊ देणार नाही. अमित शहा म्हणतात की, आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही. मग तुम्ही आधार कार्डसोबत सर्व काही का जोडत आहात, असा सवालही ममतांनी केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com