Rakshabandhan History : सिकंदर जग जिंकण्यासाठी निघाला तेव्हा एका राखीमुळे त्याचे प्राण वाचले होते ?

अलेक्झांडर द ग्रेट म्हणजेच सिकंदर
Alexander
Alexander esakal

Alexander : अलेक्झांडर द ग्रेट म्हणजेच सिकंदर जेव्हा जग जिंकण्यासाठी निघाला तेव्हा भारतीय उपखंडात राजा पोरसशी त्याचा संघर्ष झाला. असे म्हणतात की त्यावेळी अलेक्झांडरच्या पत्नीने राजा पोरसला राखी पाठवली होती आणि अलेक्झांडरचा जीव घेऊ नये अशी विनंती केली होती.

शतकानुशतके रक्षाबंधनाला बहिणी भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधत आहेत. द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाला संरक्षणाचा धागा बांधला आणि वेळ आल्यावर मदतीचे आश्वासन घेतले याचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये आहे. आधुनिक भारतातील रक्षाबंधन सणाची सुरुवात सिंधू संस्कृतीपासून म्हणजे सुमारे 5500 वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. असेही म्हटले जाते की जेव्हा सिकंदर जग जिंकण्यासाठी निघाला तेव्हा भारतीय उपखंडात राखीमुळे त्याचे प्राण वाचले होते.

Alexander
Health Care News: सतत गोड खाल्ल्याने मेंदूवर होतो परिणाम? या आहेत वाईट सवयी...

अलेक्झांडर हा मॅसेडोनिया राज्याचा एक ग्रीक योद्धा होता जो नंतर राजा बनला. त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याने ग्रीक इतिहासात नोंदवलेल्या अर्ध्या भूभागावर कब्जा केला होता. इ.स.पूर्व 356 मध्ये तो जग जिंकण्याचे स्वप्न घेऊन बाहेर पडला. इजिप्त, इराण, मेसोपोटेमिया, फोनिसिया असे अनेक प्रदेश जिंकून भारतीय उपखंडात पोहोचला.

Alexander
Health: अति फिटनेससुद्धा ठरतोय आरोग्यासाठी घातक?

राखीशी संबंधित कथा काय आहे?

जग जिंकून अलेक्झांडर जेव्हा भारतीय उपखंडात पोहोचला तेव्हा त्याचा सामना राजा पोरसशी झाला. येथे झेलम आणि चिनाब नदीच्या काठावर दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. अलेक्झांडरच्या सैन्यात त्यावेळी 50 हजारांहून अधिक सैनिक होते, असे म्हणतात, परंतु राजा पोरस आणि त्याच्या गजसेनेचे शौर्य काही कमी नव्हते.

Alexander
Health Care News: बटर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय म्हणतात

युद्ध काही दिवस चालल्यानंतर, जेव्हा राजा पोरस अलेक्झांडरवर विजय मिळवू शकतो ही बातमी अलेक्झांडरच्या पत्नीला पोहोचली, तेव्हा तिने राजा पोरसकडे राखी पाठवली आणि तिचा नवरा अलेक्झांडर जिवंत रहावा यासाठी त्याच्याकडे मदत मागितली. त्या राखीचा मान राखून पोरसने अलेक्झांडरवर प्राणघातक हल्ला केला नाही, असे म्हणतात. या वस्तुस्थितीबाबत इतिहासकारांमध्ये दोन मतप्रवाह आहेत, काही इतिहासकार याला सत्य मानतात तर काहींनी ही दंतकथा वाटते.

Alexander
Health Tips : तुम्हीही दिवसाची सुरूवात कॉफीने करत असाल तर वेळीच बदला ही सवय, महागात पडेल!

युद्ध कोणी जिंकले?

झेलम आणि चिनाब नद्यांच्या काठावर अलेक्झांडर आणि पोरस यांच्यात घनघोर युद्ध झाले. इतिहासात याला बॅटल ऑफ द हायडास्पेस असेही म्हणतात. यामध्ये कोणाचा विजय झाला याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात.

Alexander
Laughing Health Benefits: 'स्माईल प्लिज', हसल्याने तुमच्या आरोग्याला होतील हे फायदे, जाणून घ्या

खरे तर ग्रीक इतिहासकार या युद्धात अलेक्झांडरला विजयी म्हणतात, तर इतर इतिहासकारांना हे मान्य नाही. इथिओपियन महाकाव्यांचे संपादन करणाऱ्या EAW Baez यांनी अलेक्झांडरवर लिहिलेल्या पुस्तकात नमूद केले आहे की, झेलमच्या लढाईत अलेक्झांडरला खूप त्रास सहन करावा लागला. यानंतर अलेक्झांडरच्या लक्षात आले की जर त्याने युद्ध चालू ठेवले तर तो स्वतःचाच नाश करेल. त्यामुळे त्याने राजा पोरसशी तह केला होता.

Alexander
Relationship Tips : पार्टनरचा विश्वास जिंकायचाय? जाणून घ्या सोप्या टिप्स, लोक तुम्हाला म्हणतील ‘परफेक्ट कपल’

हुमायून आणि राणी कर्णावती यांचा उल्लेख

मुघलांच्या काळात रक्षाबंधनाची सुरुवात हुमायूनच्या काळापासून झाली असे मानले जाते. गुजरातच्या सुलतान बहादूर शाहने जेव्हा चित्तौडगडावर हल्ला केला तेव्हा राणी कर्णावतीने हुमायूनकडे मदत मागण्यासाठी राखी पाठवली होती. त्यावेळी हुमायून ग्वाल्हेरमध्ये होता. राखी मिळाल्यानंतर, हुमायूनने आपले सैन्य गोळा केले आणि तो चित्तौडगडला पोहोचला तोपर्यंत राणी कर्णावतीने इतर स्त्रियांसह जौहर मध्ये उड्या टाकल्या होत्या. यानंतर हुमायूनने बहादूरशहाशी युद्ध केले, ज्यात बहादूर शाहचा पराभव झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com