

इंदूरहून नुकत्याच झालेल्या लग्नानंतर मेघालयात हनिमूनसाठी आलेले राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम अचानक बेपत्ता झाले. या घटनेने पोलीस विभागाला हादरवून सोडले होते. त्यानंतर डोंगराळ आणि दुर्गम भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली. शेकडो सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आले. परंतु कोणताही सुगावा लागत नव्हता. पोलीस सतत या प्रकरणाची उकल करत होते. पण संपूर्ण प्रकरण एक गूढच राहिले. मग स्थानिक मार्गदर्शक अल्बर्ट पी.डी. आले. ज्यांच्या थोड्याशा माहितीमुळे संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलली.