karnataka Election : कोणत्या इंजिनला कमिशनचा किती वाटा मिळाला?, राहुल गांधींचा सवाल; मोदी यांच्या मौनावर टीका

कर्नाटकात गेल्या तीन वर्षांपासून भाजपचे सरकार असल्याने पंतप्रधानांना येथील भ्रष्टाचाराची जाणीव आहे.
congress Rahul Gandhi News
congress Rahul Gandhi NewsSakal

karnataka Election बंगळूर - ४० टक्के ‘कमिशन’मधून ‘डबल इंजिन सरकार’ला किती वाटा मिळाला, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथे केला. कर्नाटकातील भ्रष्टाचारावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते अनेकल येथील प्रचारसभेत ते बोलत होते. अदानींचा मुद्दा संसदेत उपस्थित केल्याबद्दल आपणास खासदारपदावरून अपात्र ठरवल्याचा आरोपही त्यांनी केला.

कर्नाटकात गेल्या तीन वर्षांपासून भाजपचे सरकार असल्याने पंतप्रधानांना येथील भ्रष्टाचाराची जाणीव आहे. तुम्ही फक्त ‘डबल इंजिन सरकार’ म्हणत आहात; पण कर्नाटकातील लोकांना सांगा, की कोणत्या इंजिनला ४० टक्के कमिशनपैकी किती पैसे मिळाले. कर्नाटकातील कंत्राटदारांच्या संघटनेने पंतप्रधानांना पत्र लिहून ४० टक्के कमिशन वसूल केले आहे, असे सांगूनही मोदींनी उत्तर दिलेले नाही.

congress Rahul Gandhi News
Pune : काळजाला भिडणारी सहज-सुंदर गोष्ट

घोटाळ्यांवर घोटाळे झाले आहेत. पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, सहा‍य्यक अभियंता यांच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. काँग्रेसच्या एका नेत्याला भाजपच्या एका आमदाराने सांगितले की, म्हैसूर सँडलवूड घोटाळ्यात एका आमदाराचा मुलगा आठ कोटी रुपयांसह पकडला गेला आहे.

आणि तो दोन हजार ५०० कोटी रुपये देऊन मुख्यमंत्रिपद विकत घेऊ शकतो, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान येऊन सांगतात की काँग्रेसने ९१ वेळा त्यांचा अपमान केला आहे; पण कर्नाटकने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काय केले, कोणती चौकशी झाली आणि किती लोकांना तुरुंगात टाकले, हे आधी सांगावे, अशी मागणीही त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com