कामाच्या धावपळीत रोजचा नाश्ता करणं अनेकांना जमतंच असं नाही. त्यामुळे तुम्हाला अनेक समस्या निर्माण होतात.गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये स्मृतिभ्रंशाबद्दल जागरूकता वाढली आहे, त्यामुळे लोक या आजाराला गांभीर्याने घेऊ लागले आहेत. वयाच्या ६० नंतर स्मृतिभ्रंशाची लक्षणे दिसू लागतात, पण कालांतराने वयाच्या ३० वर्षानंतरही लोक स्मृतिभ्रंशाला बळी पडत आहेत. जीवनशैली आणि कमी शारीरिक हालचालींमुळे त्याचा मेंदूवर सर्वाधिक परिणाम होतो. तसेच नाश्ता न केल्यामुळेही परिणाम होत आहे. यावर अभ्यास करण्यात आला आहे.
अभ्यास काय सांगतो?- सकाळी पौष्टीक नाश्ता खाल्ल्याने तुमचे डोके एक्टीव्ह राहते तसेच काम करण्यासाठी जास्त एनर्जी मिळते. पण तुम्ही सकाळी नाश्ता केला नाही तर दिवसभर तुम्हाला थकवा जाणवतो. एका अभ्यासानुसार, दिवसातलं पहिलं खाणं सोडल्यास तुम्हाला स्मृतिभ्रंशाचा धोका अधिक आहे. जपानी जर्नल ऑफ ह्युमन सायंसेस ऑफ हेल्थ सोशल सर्व्हिसेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार सकाळचा नाश्ता न केल्यास स्मृतिभ्रंशाचा धोका चार पटीने वाढतो.
अभ्यासातले निष्कर्ष - जपानी जर्नल ऑफ ह्युमन सायंसेस ऑफ हेल्थ सोशल सर्व्हिसेसमध्ये २०११ साली प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार सकाळचा नाश्ता न केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या अभ्यासात जपानमधील एका शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या समुदायावर ६ वर्ष अभ्यास करण्यात आला. यात ६५ वर्षांच्या जवळपास ५२५ लोकांचा सहभाग होता. लिंग आणि वय असूनही ज्या लोकांनी इतके वर्ष नाश्ता केला नव्हता त्या लोकांना स्मृतिभ्रंशाचा धोका चार पटीने जास्त होता, असे आढळले.
स्नॅक्स हा आरोग्यदायी पर्याय नाही- पोटभर अन्न खाण्याऐवजी स्नॅक्स किंवा अनहेल्दी पदार्थ खाण्याची सवय स्मृतिभ्रंशाचा धोका वाढवू शकते, असेही या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. जे लोकं पौष्टीक नाश्ता करत नाहीत त्यांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता २.७ पट जास्त असते. नाश्त्याच्या सवयींव्यतिरिक्त इतरही अनेक सवयी आहेत ज्यामुळे स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढतो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.