श्रीलंकेला भारताने पाठविले ४० हजार टन डिझेल

भारताने शेजारी राष्ट्राला दिला मदतीचा हात
srilanka fuel crisis
srilanka fuel crisis Sakal

श्रीलंकेत आर्थिक आणीबाणी आहे. परिस्थिती हाताबाहेर गेलीय. महागाई प्रचंड वाढलीय. देशातील इंधन संपल्याने पेट्रोल -डिझेल खरेदी करण्यासाठी लांबच्या-लांब रांगा लागल्या आहेत. श्रीलंकेला मदत म्हणून भारताने ४०,००० टन डिझेल पाठविले आहे. १ एप्रिल रोजी श्रीलंकेचे राष्ट्रपति गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी आणीबाणी जाहिर केलीय.

srilanka fuel crisis
'भारत-ऑस्ट्रलिया' करार: 10 लाख रोजगाराच्या नव्या संधी

१२ ते १५ तास वीजकपातीने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकं रस्त्यावर उतरलेत. आरोग्यसुविधांनी देखील मान टाकलीय. अशातचं नागरिकांनी राष्ट्राध्यक्ष गोटाबाय यांच्या घरावरचं हल्ला केला. श्रीलंकन पोलिसांनी १५ जणांना या प्रकरणात अटक केलीय. तर ५४ जणांना ताब्यात घेण्यात आलंय, इंधनाची कमतरता असल्याने अनेक पेट्रोलपंपावर इंधन खरेदीसाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. ''भारताने पाठविलेली मदत श्रीलंकन नागरिकांसाठी आनंदाची बातमी असल्याचं, सिलॉन पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सुमिथ विजेसिंघे यांनी म्हंटलयं.' न्यूज वायर या माध्यमसंस्थेशी ते बोलत होते.

भारत डिझेलबरोरबच तांदूळ देखील पाठवणार आहे. भारताने श्रीलंकेला १ अब्ज डॉलरचं कर्ज देण्याविषयचा करार मार्चमध्ये झाला होता. त्याअंतर्गत खाद्यउत्पादन, धान्य, औषध आणि इतर खरेदीसाठी हे कर्ज देण्यात आलंय. १७ मार्च रोजी श्रीलंकेचे विदेशमंत्री भारत दौऱ्यावर आले असताना हा करार झाला होता. (Sri lanka economic crisis)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com