India Pakistan UN : आपल्याच नागरिकांवर बॉम्ब हल्ले करणाऱ्या देशाने आम्हाला शिकवू नये, दहशतवादावरुन भारताने पाकिस्तानला सुनावले खडे बोल

Cross Border Terrorism : 1971 मधील ऑपरेशन सर्चलाईटचा संदर्भ देत पाकिस्तानच्या भूतकाळातील हिंसाचाराची आठवण करून दिली. सीमापार दहशतवाद थांबवण्यासाठी दहशतवादाला समर्थन देणाऱ्या देशांना जबाबदार धरण्याची भारताची ठाम मागणी.
India’s representative addressing the United Nations, strongly condemning Pakistan over cross-border terrorism and civilian attacks.

India’s representative addressing the United Nations, strongly condemning Pakistan over cross-border terrorism and civilian attacks.

esakal

Updated on

भारताने दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकिस्तानला प्रभावीपणे गप्प केले. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी पी. हरीश यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानवर तोफ डागत त्यांनी ठामपणे सांगितले की, ज्या देशाचा इतिहास नरसंहार आणि हिंसाचाराने भरलेला आहे, त्या देशाला भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. शिवाय, भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये सीमापार दहशतवादाबाबत एक कडक संदेशही दिला. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रांना जबाबदार धरले जावे, अशी मागणी पी. हरीश यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com