
भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार केला जात आहे. यात फक्त लष्करच नव्हे तर नागरिक, दवाखाने आणि शाळा यांनाही लक्ष्य केलं जात आहे. पाकिस्तानच्या माऱ्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानच्या एअरबेसवर भारताने हल्ला केला. ऑपरेशन सिंदूरनंतर दोनच दिवसात पाकिस्तानने गुडघे टेकले असून भारताने हल्ले थांबवले तर आम्हीही संयम बाळगू असं पाकिस्तानने म्हटलंय. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी एका न्यूज चॅनलशी बोलताना नरमाईची भूमिका मांडलीय.