'भारताला असा धडा शिकवू की, आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल'; पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून धमकी वजा इशारा, देशाला शत्रूही म्हटलं
Pakistan Threat To India, Shahbaz Sharif Warning : २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली असून, त्यात १९६० चा सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) स्थगित करण्याचाही निर्णय आहे.
Pakistan PM Shahbaz Sharif’s Stern Warning to India :पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मंगळवारी ठाम भूमिका घेत भारताला धमकी वजा इशारा दिला आहे. 'पाकिस्तानच्या पाण्याचा एक थेंबही हिसकावण्याची परवानगी दिली जाणार नाही', असं त्यांनी म्हटलंय.