
भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला हादरवून टाकले आहे. ६-७ मे च्या रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरवर क्षेपणास्त्र हल्ला केला. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. त्यांचे लाँच पॅड पूर्णपणे नष्ट केले. या हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील अनेक लोकांचाही मृत्यू झाला आहे. भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.