भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुखांचं मोठं वक्तव्य

Indo-China border, Army Chief, manoj narwane
Indo-China border, Army Chief, manoj narwane

नवी दिल्ली- भारत आणि चीनमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील उच्च स्तरीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा पार पडत आहे. तसेच चीनकडून स्थानिक पातळीवर समकक्ष पदाच्या कमांडरमध्ये चर्चा सुरु आहे. त्यामुळे लवकरच भारत-चीनमधील परिस्थिती साधारण होईल, असं नरवणे म्हणाले आहेत. ते देहराडूनमधील सैन्य अकादमीतील एका कार्यक्रमात बोलत होते. दोन्ही देशांमध्ये लष्कर आणि राजकीय पातळीवर चर्चा सुरु आहेत. त्यामुळे भारत आणि चीनमध्ये जो वाद निर्माण झाला आहे तो लवकरच निवळेल अशी आशा आहे. तसेच भारतीय सीमेवरील सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे, असंही ते म्हणाले आहेत. शुक्रवारी पूर्व लडाखच्या भागात दोन्ही देशाच्या मेजर जनरल रँकच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. त्यानंतर एका दिवसाने मनोज नरवणे यांचे वरील वक्तव्य आलं आहे. 

मे महिन्याच्या सुरुवातीपासून भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु झाला आहे. चीनच्या सैनिकांनी 6 मे रोजी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. त्यावेळी भारतीय आणि चिनी लष्करामध्ये हातापायी झाली होती. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे बनले आहेत. दोन्ही देशांनी ताठर भूमिका घेतल्याने परिस्थिती बिघडतच चालली आहे. 5-6 मेनंतर दोन्ही देशांच्या मेजर जनरल रँकच्या अधिकाऱ्यांमध्ये पाच वेळा बैठका पार पडल्या आहेत. मात्र, ठोस असे काही निष्पण होत नसल्याने वाद कायम आहे. 

शुक्रवारी भारतीय मेजर जनरल अभिजीत बापट( कारुमधील पायदळ विभागाचे कमांडर) आणि चीनच्या समकक्ष कमांडरमध्ये जवळपास 5 तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. पूर्व लडाख सीमारेषेवर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांनी महत्वाच्या ठिकाणी आपले सैन्य तैनात केले आहे. पूर्व लडाखमध्ये भारताने 10 हजार सैन्य तुकड्या तैनात केल्याची माहिती आहे. चीननेही सीमारेषेवर सैनिकांची जमवाजमव सुरु केली आहे. भारत आणि चीन या देशांमध्ये 3488 किलोमीटरची सीमारेषा आहे. त्यादृष्टीने दोन्ही देशांनी सीमाभागात हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, भारताने गालवान भागात मोठ्या प्रमाणात निर्माणकार्य हाती घेतलं आहे. तसेच भारताकडून या भागात धावपट्टीही तयार करण्यात आली आहे. भारताच्या या तयारीमुळे चीन बिथरला आहे. त्यामुळेच चीनने खुस्पटी काढणे सुरु केले असून अनेक भारतीय भागांवर आपली मालकी सांगितली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com